आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील निमगुळ येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कापसाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पाठवणयात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, कापूस पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. तसेच इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. कपाशीला चांगला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी कापूस घरात ठेवता आहे.
शेतकऱ्यांवर कमी भावात कपाशीची विक्री करण्याची वेळ आली आहे. कपाशीला चांगला भाव मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी शांताराम पाटील, विजय मोरे, दत्तात्रय बोरसे, प्रवीण सोनवणे, जयवंत पाटील, तुकाराम पाटील, महेश सूर्यवंशी, अनिल ठाकरे, आकाश देवरे आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.