आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थिनींसमोर अभ्यासासह इतर अनेक समस्या असतात. त्याचप्रमाणे पालकांच्या मनात पाल्यांविषयी काही शंका असतात. तसेच मुलांनाही पालकांविषयी त्यांचे विचार मांडावेसे वाटतात. त्यामुळे त्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चारित्र्यसंपन्न शिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे मत डॉ. अभिनव दरवडे यांनी व्यक्त केले. शहरातील स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई कन्या शाळेत विद्यार्थिनी व पालकांसाठी समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. तुषार भट, संस्थेच्या अलका बियाणी, उपाध्यक्षा सरोज देशपांडे, सचिव शिल्पा म्हस्कर, सहसचिव अरुणा नाईक, मुख्याध्यापिका मनीषा जोशी, समुपदेशन समितीच्या सदस्या डाॅ. कावेरी जोशी, शिक्षक- पालक संघाच्या सचिव डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. सौख्या चिंगरे, सुषमा दाते आदी उपस्थित होते. समुपदेशन केंद्राचे कायदेशीर सल्लागार अॅड. सारंगी गुजराथी व सदस्य अॅड. विशाल भट आहे. डॉ. दरवडे म्हणाले की, भावनेचे घर शाळा असते. पालकांनी मुलांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवाव्या.
तसेच आजच्या काळात चारित्र्य संपन्न शिक्षण मुलांना दिले जाणे आवश्यक आहे. मुलांना त्यांचे प्रश्न मोकळेपणाने मांडता आले पाहिजे यासाठी घरातूनच सुसंवाद साधला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले. डॉ. तुषार भट म्हणाले की, प्रत्येक पालकांनी मुलांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारले पाहिजे. आपला पाल्य कोणत्या गोष्टीत पुढे आहे याचा शोध घ्यावा, असेही ते म्हणाले. कोटा करिअर अकॅडमीची माहिती प्रा .सविता अग्रवाल यांनी दिली. शालिनी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.