आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते व पुलांची अतिवृष्टीमुळे दुरवस्था झाली. त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे ३५ कोटी ८८ लाखांची मागणी जिल्हा परिषदेने केली होती. पण दोन वर्षांपासून शासनाने दुरुस्तीसाठी निधी दिला नाही. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ग्रामीण भागात रस्त्यांची दैना झाली आहे.
ग्रामीण भागातील ७६ रस्ते आणि ६६ पूल क्षतिग्रस्त झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी ३५ कोटी ८८ लाखांची प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाला पाठवला आहे. पण अद्याप निधी मिळालेला नाही. अतिवृष्टीमुळे प्रकाशा ते ब्राम्हणवेल मार्गावरील पूल, प्रकाशा, छडवेल, दहिवेल व सामोडे रस्त्यावरील पूल, नवापूर- पिंपळनेर रस्ता, कुडाशी ते बोपखेल रस्त्यावरील पाइपमोरी खराब झाली आहे. जिल्ह्यातील ७६ रस्त्यांसाठी १४ कोटी ५३ लाख व पाइप मोरी, लहान व मोठे पूल दुरुस्तीसाठी २१ कोटी ३५ लाखांची आवश्यकता आहे. प्रस्ताव शासनाकडे पडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.