आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:नियोजन नसल्यानेच सात‎ दिवसांनंतर शहरात पाणी‎

धुळे‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनेक भागात सात ते‎ आठ दिवसांनंतर पाणी येते.‎ जलस्राेतांमध्ये मुबलक साठा‎ असला तरी प्रशासनाचे नियोजन‎ नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचा‎ आरोप नगरसेवकांनी गुरुवारी‎ झालेल्या स्थायी समितीच्या सभेत‎ केला. पाणीप्रश्नावर चर्चेसाठी‎ शुक्रवारी बैठक घेण्याचा निर्णय‎ सभेत झाला.‎ मनपा सभागृहात झालेल्या सभेला‎ स्थायी समिती सभापती किरण‎ कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन‎ कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ‎ आदी उपस्थित होते. महिला‎ दिनाच्या दिवशी झालेल्या‎ कार्यक्रमात अनेक महिलांनी‎ पाणीपुरवठा उशिरा होत असल्याची‎ तक्रार केल्याचा आरोप सभेत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झाला. साबीर खान यांनी रमजान‎ महिन्याला प्रारंभ होणार असून, या‎ काळात नियमित पाणीपुरवठा‎ करावा, अशी मागणी केली.‎ नगरसेवक नरेश चौधरी यांनी‎ पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार‎ केली. नगरसेवक सुनील बैसाणे‎ यांनीही लक्ष वेधले. याविषयावर‎ पुढील आठवड्यात बैठक होईल.‎

घरपट्टी कमी केली जावी‎
अवकाळी पावसाचा मनपा हद्दीतील‎ दहा गावांत राहणाऱ्या शेतकऱ्यांना‎ फटका बसला आहे. त्यामुळे या‎ भागातील मालमत्ताधारकांची घरपट्टी‎ प्रशासनाने कमी करावी, ती कमी‎ केली नाही तर २७ मार्चला दहा‎ गावातील नागरिकांसह महापालिकेत‎ उपोषण करू असा इशारा नगरसेवक‎ किरण अहिरराव यांनी दिला.‎

बातम्या आणखी आहेत...