आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये १ हजार ६ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. या जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून आत्तापर्यंत २ हजार ४०६ अर्ज दाखल झाले आहे. अर्ज भरण्याची मुदत आणखी तीन दिवस शिल्लक असल्याने अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरटीईतंर्गत प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे.
ही प्रक्रिया सुरू झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस अर्ज भरताना अडचणी येत होत्या. पण आता ही प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. यंदा पालकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पट अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी चढाओढ असेल. ऑनलाइन सोडत काढून प्रवेश निश्चित होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.