आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाने मोफत धान्य देवून रेशनिंगचे दुकाने पूर्णत: बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने घातलेला आहे. त्यामुळे कंटाळून निम्मे परवानाधारक राजीनामे देतील आणि इतर परवानाधारक कारणे दाखवून दुकाने बंद करतील अशी मोदी सरकारची योजना असल्याचा आरोप करीत नंदुरबार जिल्ह्यातील १ हजार ६४ रेशन दुकानदारांनी ७ ते ९ फेब्रुवारी पर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय घेतलेला आहे.
सोमवारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन यांनी माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना महासंघाच्या वतीने दि.७ ते ९ फेब्रुवारी या तीन दिवशी ऑल इंडिया फेअर शॉप डिलर्स फेडरेशन, नवी दिल्ली सलग्नीत अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने दुकाने पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे. पत्रकावर संजय चौधरी, प्रमोद बोडखे, नाना ठाकरे, जे बी शर्मा, शुभम रघुवंशी, ए एम अग्रवाल, प्रताप चौधरी, सदाशिव राजपूत,सुनील वैद्य, सु.भा वैद्य, प्रकाश चौधरी,अक्षय चौधरी आदींच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.