आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील धांद्रे बुद्रूक येथील स्वस्त धान्य दुकान नेहमी बंद असते. लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळत नाही. वारंवार सूचना देऊनही दुकानदाराच्या कार्यपद्धतीत बदल होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभेत ठराव करुन संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करून कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
धांद्रे गावातील स्वस्त धान्य दुकान नेहमी बंद असते. लाभार्थ्यांना नियमाने रेशन मिळत नाही. लोकांना रेशन दुकानदाराची वाट पाहत बसावे लागते. नोव्हेंबर २०२२ पासून दुकान नियमित बंद असते. जो माल वाटप होतो त्याची पावती दिली जात नाही, असाही आरोप तक्रारीत केला आहे. त्यामुळे परवाना रद्द करावा व गावातील बचत गटांना नवीन परवाना मंजूर करावा, असा ठराव ग्रामसभेने सर्वानुमते पारित केल्याचेही दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.