आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात १ लाख १४ हजार घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी ८६ हजार घरकुले पूर्ण झाली आहेत. ३२ हजार घरांची कामे अपूर्ण आहेत. ३१ मार्चपर्यंत घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे तसेच जो भूमीहीन आहे, असे कुटुंब घरे बांधणार कुठे? असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आला.
जि.प. अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, समाज कल्याण समिती सभापती शंकर पाडवी, सभापती गणेश पराडके, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. घरकुल मंजुरीसाठी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सदस्य विजय पराडके यांनी केला. विविध विषयांवर चर्चा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.