आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउदय नदीवरील बिलगाव ते सावऱ्या दिगर या गावांना जोडणाऱ्या व मंजूर असलेल्या महत्त्वाकांक्षी पुलाचे अर्धवट काम सुरू करून पूर्ण न करावे, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. काम सुरू न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला. या मागणीसाठी निदर्शनेही करण्यात आली.
बिलगाव ते सावऱ्या दिगर या दरम्यान उदय नदीवर मंजूर असलेला पूल गेली १० वर्षे अर्धवट स्थितीत तसाच आहे. संघटना व सावऱ्या दिगर गावकऱ्यांमार्फत या बाबत १० फेब्रुवारी २०२२ रोजी तहसील कार्यालयात निवेदन देऊनही काम सुरू झाले नाही. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी २१ रोजी तहसील कार्यालयास घेराव घातला हाेता.
त्यानंतर प्रशासनाने कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची पुलाच्या अर्धवट कामाच्या ठिकाणी २ मार्चला बैठक घेतली हाेती. त्यात संबंधितांनी काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी ते पाळलेले नाही. दरम्यान नर्मदा प्राधिकरण व भिंगारे समिती यांच्या अहवालानुसार या पुलाची निर्मिती सुरू झाली.
पण पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. या परिसरात राहणाऱ्या तब्बल १२ हजार आदिवासी नागरिकांना शिक्षण, आरोग्य आदी समस्या भेडसावत आहे. त्या साेडवण्यासाठी या पुलामुळे मदत होणार आहे. वर्षभरापासून संघटना वारंवार पत्रव्यवहार करत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरू करण्याबाबत हालचाल केली जात नाही. त्यामुळे २० दिवसांची मुदत देत असून त्यात पुलाचे काम सुरू न झाल्यास संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ उपोषणास बसतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.