आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:नंदुरबार-धानोरा रस्त्यावरील ढेकवद‎ रेल्वेगेट वाहतुकीसाठी चार दिवस बंद‎

नंदुरबार‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार-धानाेरा मार्गादरम्यान‎ असलेल्या ढेकवद या रेल्वे गेटचे रेल्वे‎ विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती‎ घेण्यात आल्याने २ ते ५ फेब्रुवारीच्या‎ सायंकाळपर्यंत तब्बल चार दिवस‎ नंदुरबार ते धानोरा मार्ग बंद ठेवण्यात‎ आला आहे. या मार्गे हाेणारी वाहतूक‎ वळवण्याचे निर्देेश देण्यात आले आहेत.‎ रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती संदर्भात‎ अचानक हा निर्णय घेतल्याने पाेलिस‎ प्रशासनाची वाहतुकीच्या संदर्भात‎ नियोजन करताना धावपळ उडाली.‎ नारायणपूर व पाचोरा बारी हे दोन पर्यायी‎ मार्ग उपलब्ध आहेत. मात्र त्यांचे‎ सरासरी अंतर पाच कि.मी. इतके‎ असल्याने नंदुरबारकरांना फेऱ्याचा‎ भुर्दंड पडणार अाहे.‎

नंदुरबार ते धानाेरा या मार्गावरील गेट‎ रेल्वे रूळ दुरुस्तीच्या कामासाठी बंद‎ करण्यात येणार असल्याने शहर‎ पोलिसांनी काळजी घ्यावी, असे निर्देश‎ अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी‎ दिले आहेत. ढेकवद परिसरात दोन‎ गेट असल्याने अनेकांना या रेल्वे‎ गेटच्या संदर्भात आधी संभ्रम निर्माण‎ झाला.

त्यानंतर पोलिस विभागाने‎ काेणत्या गेटजवळ दुरुस्तीचे काम‎ होणार, याची माहिती घेतली. तेव्हा‎ धानोरा मार्गावरील ढेकवद रेल्वे गेट‎ चार दिवस बंद राहणार असल्याचे‎ सांगण्यात आले. माळी वाड्याच्या पुढे‎ हे ढेकवद रेल्वे गेट आहे.

पाचोरा‎ बारीपासून ढेकवद गावासाठी मोठ्या‎ वाहनांना प्रवेश असेल. तर पाचोरा‎ बारीचे रेल्वे गेट बंद आहे; परंतु पर्यायी‎ मार्ग म्हणून तेथील पुलाखालून गाड्या‎ सुरू आहेत. लहान वाहने, दुचाकी‎ वाहनांसाठी माळी वाडा, नारायणपूर‎ मार्गे वाहतुकीची पर्यायी व्यवस्था‎ आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने रूळ‎ दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांचे पत्र‎ मिळताच जिल्हा प्रशासनाने पोलिस‎ प्रशासनाला माहिती दिली.‎

शिक्षकांसह विद्यार्थी,‎ शेतकऱ्यांना करावा‎ लागणार पर्यायी‎ मार्गाचा अवलंब‎
रेल्वे दुरुस्तीचे काम सुरू होणार, रस्ता बंद होणार या संदर्भात माध्यमांना माहिती देत‎ असताना पर्यायी मार्ग काेणता, असा प्रश्न ‘दिव्य मराठी''ने उपस्थित केल्यानंतर‎ प्रशासनाने धावपळ करत पर्यायी मार्ग निश्चितीचे निर्देश दिले. धानोरा मार्गावर‎ शेतीसह अनेक गावे, आश्रम शाळा, शाळा आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या‎ शिक्षकांसह शेतकऱ्यांना चार दिवस त्याएेवजी अन्य मार्गाचा वापर करावा लागेल.‎

ऐनवेळी मिळाली सूचना; उडाली तारांबळ
पाचोरा बारीपासून ढेकवद गावासाठी मोठ्या वाहनांना प्रवेश‎ असेल. तर पाचोरा बारीचे रेल्वे गेट बंद आहे; परंतु पर्यायी मार्ग‎ म्हणून वाहतूक सुरू अाहे. लहान वाहने, दुचाकी वाहनांसाठी‎ माळी वाडा, नारायणपूर मार्गे वाहतुकीची पर्यायी व्यवस्था आहे.‎ दरम्यान रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांचे पत्र‎ मिळताच जिल्हा प्रशासनाने पोलिस प्रशासनाला वाहतूक‎ वळवण्याची सूचना केली; परंतु ऐन वेळी पत्र प्राप्त झाल्याने‎ प्रशासनाला नियोजन करताना तारांबळ उडाल्याचे चित्र हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...