आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुखर जीवनासाठी शुद्ध मानाने धम्म पालन करा‎; श्रामनेर शिबिर समारोपप्रसंगी पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांचे प्रतिपादन‎

शहादा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुद्ध मनाने धम्माचे पालन केल्यास‎ मानवी जीवन सुखकर होईल. धम्म‎ आचरणात आणावा लागतो.‎ पंचशील आचरणाने मन शुद्ध होते.‎ समाजात बंधुभाव, एकता,‎ एकात्मिकता निर्माण करायची‎ असेल तर समाजा समाजात अशा‎ प्रकारे शिबिर आयोजित झाले‎ पाहिजे, असे प्रतिपादन‎ अक्कलकुवा येथील पोलिस‎ उपअधीक्षक संभाजी सावंत यांनी‎ केले.‎ महामाया बुद्ध विहार मोहिदा‎ तालुका शहादा येथे पूज्य भन्ते‎ आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली दहा‎ दिवसीय चिवरधारी श्रामनेर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिबिराचे आयोजन करण्यात आले‎ होते.

शिबिराच्या समारोप प्रसंगी‎ संभाजी सावंत बोलत होते.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी‎ श्रामनेर भगवान बिरारे होते. प्रमुख‎ अतिथी म्हणून शहाद्याचे प्रभारी‎ पोलिस निरीक्षक राजन मोरे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सभापती वीरसिंग ठाकरे, सामाजिक‎ कार्यकर्ते रवींद्र रावल, शेतमजूर‎ युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुनील‎ गायकवाड, डॉ. रवींद्र गुलाले,‎ भगवान महिरे, डॉ. सुमीत देवरे,‎ अलका जोंधळे, सुरेखा महिरे,‎ अरुणाबाई महिरे, सामाजिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यकर्त्या सुरेखा महिरे आदी‎ उपस्थित होते. या वेळी अॅड. डी.‎ एन. पिसोडकर, मधुकर भिसे,‎ सुनील गायकवाड, भंन्ते भिमानंद,‎ भंन्ते आनंद, भन्ते आर्यानंद, भन्ते‎ पियदस्सी, भन्ते अनोमदर्शी, भन्ते‎ सुमेध आदींसह मान्यवरांनी आपले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अनुभव मांडले. सूत्रसंचालन माजी‎ श्रामनेर सुधीर ठाकरे यांनी केले.‎

पंचशीलाचे पालन करावे‎
भन्तेजी आनंद म्हणाले शील, श्रद्धा,‎ बुद्ध धम्मात कर्म सिद्धान्त महत्वपूर्ण‎ मानला जातो. बुद्ध धम्मात‎ आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी‎ पंचशीलाचे पालन केले पाहिजे.‎ पंचशील म्हणजे मानव मुक्तीच.‎ प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे‎ म्हणाले, संविधानाचा सारनामा‎ मानवाच्या मुक्तीसाठी आहे. त्यात‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानव‎ कल्याणाचे तत्त्व मांडले. मानव‎ कल्याणाचे तत्त्वच बुद्ध धम्माचा‎ मूळ पाया आहे, असे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...