आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात फळ उत्पादक बागायतदार शेतकरी व व्यापारी यांच्यात दिनांक ३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता सामूहिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात होऊन ४ जानेवारीपासून पपई पिकासाठी नऊ रुपये किलो भाव ठरवण्यात आला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांनी दिली.
बैठकीला फळ बागायतदार उत्पादक शेतकरी संस्थेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, जयनगर येथील शेतकरी भगवान पाटील, वरुळ-कानडी येथील शेतकरी अशोक पाटीलसह अन्य शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये हाजी नाजीम हाजी, फारुख हाजी, मुल्ला शेख, राजस्थानी व्यापारी जोगाराम, प्रकाशराम व इतर व्यापारी उपस्थित होते.
सध्याच्या परिस्थितीत असलेले पपईचे उत्पादन शेतकऱ्यांना त्यासाठी लागणारा खर्च बघता शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येत होते. शेतकरी गेल्या एक महिन्यात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत साडेसात रुपये किलो हा भाव जाहीर करून तोडगा काढला होता. मात्र पुन्हा भाव वाढ करण्यात यावा, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला होता. त्यानुसार निर्णय घेण्यात आला.
समन्वयातून काढला मार्ग
शेतकरी व व्यापारी यांनी आपसात तडजोड करून पपईला नऊ रुपये किलो भाव देऊन चांगला मार्ग काढला आहे. यात दोघांचे हित जोपासण्याच्या प्रयत्न केला आहे. -अभिजीत पाटील, जिल्हाध्यक्ष, फळबागातदार उत्पादक शेतकरी संस्था
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.