आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरकारभार:खड्डेमुक्त रस्त्यांसाठी करण चौफुलीवरील ‎ खड्ड्यांभाेवती रांगाेळी; रायुकाँतर्फे निदर्शने ‎

नंदुरबार‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराजवळून जाणारा राष्ट्रीय‎ महामार्ग तत्काळ खड्डेमुक्त करा, या‎ मागणीसाठी येथील महामार्गावरील‎ करण चौफुलीवर राष्ट्रवादी युवक‎ काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात‎ आले. गांधीगिरी करत खड्ड्यांभाेवती‎ रांगाेळी काढून संबंधित विभागाचा‎ गलथान कारभार आणि निकृष्ट‎ दर्जाचे रस्ते या विरोधात निदर्शनेही‎ करण्यात येऊन शासनाचे लक्ष‎ वेधण्यात आले. राष्ट्रवादी युवक‎ काँग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे‎ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात‎ आले.

१५ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती‎ न झाल्यास अशाच प्रकारे आंदाेलने‎ करण्याचा इशारा आंदाेलनकर्त्यांनी‎ दिला.‎ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने‎ केलेले दुर्लक्ष आणि संबंधित‎ विभागाच्या गलथान कारभारामुळे‎ बायपास महामार्गाची मोठ्या‎ प्रमाणावर दुरवस्था झाली असून,‎ वाहनधारकांना येथून मार्गक्रमण‎ करताना तारेवरची कसरत करावी‎ लागत आहे. काही वेळा अपघातही‎ घडतात.

या निकृष्ट दर्जाच्या‎ रस्त्याची चौकशी होऊन त्वरित‎ महामार्ग खड्डेमुक्त करावा आणि‎ वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी‎ मागणी करण्यात आली आहे.‎ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे‎ जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी,‎ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे‎ जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे,‎ राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष लल्ला‎ मराठे, तालुकाध्यक्ष दिनेश माळी,‎ विद्यार्थी शहराध्यक्ष जयंत मोरे, युवक‎ कार्याध्यक्ष कालू पहिलवान,‎ राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे,‎ युवक उपाध्यक्ष लाला बागवान,‎ अनमोल पाडवी, अदनान मेमन, राजू‎ शिंदे, लखन चव्हाण, सुनील ठाकरे,‎ मच्छिंद्र शिंदे, रवींद्र चव्हाण आदी या‎ आंदाेलनात सहभागी झाले.‎ दुरुस्तीसाठी दिला ‘अल्टिमेटम’‎ येत्या १५ दिवसांच्या आत‎ चाैफुलीवरील रस्त्याची दुरुस्ती झाली‎ नाही तर अशाच प्रकारे वारंवार‎ आंदोलने केली जातील, असा इशारा‎ आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.‎

अपघात घडूनही वर्षानुवर्षे‎ दुरुस्ती प्रलंबित
या चौफुलीवर साधारणपणे एक ते दीड‎ फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. या‎ खड्ड्यांमधून वाहन चालवणे चालकांना‎ अतिशय जिकिरीचे झाले आहे. विशेषत:‎ दुचाकी वाहन धारकांना वाहन नेणे खूप‎ कठीण जाते. येथे गंभीर अपघात देखील‎ घडतात. वर्षानुवर्षे हा विषय प्रलंबित‎ राहिला असून, आंदोलने करून, निवेदने‎ देऊनही या खड्ड्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग‎ विभागामार्फत कारवाई झालेली नाही.‎ याचा अर्थ संबंधित विभाग अपघातांत‎ जीवितहानीची तर प्रतीक्षा करत नाही ना,‎ असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. येथून‎ पुढे नवापूर चौफुलीपर्यंत जाणाऱ्या‎ रस्त्यावरही अनेक खड्डे पडले आहेत.‎ विशेषतः तळोदा बायपास म्हणून‎ ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावरील‎ खड्ड्यांची खाेली तर दोन फुटांपर्यंत आहे.‎ त्यामुळे वाहनधारक, सर्वसामान्य जेरीस‎ आले आहेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत‎ पाहू नये, असेही आंदाेलनावेळी बजावून‎ सांगण्यात आले.‎

चाैफुलीवर एक-दीड फुटांच्या खड्ड्यांचे साम्राज्य‎
नंदुरबार शहराच्या उत्तरेला असणाऱ्या‎ करण चौफुलीपासून शहादा, तळोदा,‎ अक्कलकुवा व इतर राज्यांत‎ जाण्यासाठी महामार्ग उपलब्ध आहे.‎ तसेच या भागात जाणाऱ्या प्रत्येक‎ वाहनाला या चौफुली मार्गेच जावे‎ लागते. याप्रमाणे अर्धे शहरही करण‎ चौफुली भागात वसलेले आहे.‎ शहरातील नागरिकही बाजारात‎ जाण्यासाठी या चौफुली मार्गेच ‎ वाहतूक करतात. वाहतुकीच्या दृष्टीने ‎ महत्त्वाच्या चौफुलीवर एक ते दीड ‎ फुटाच्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले ‎ आहे. चार रस्त्यांची वाहतूक एकत्र ‎ आल्यानंतर तयार हाेणाऱ्या ‎ चौफुलीवरून वाहनांची वर्दळ माेठी ‎ असल्याने रस्ता चांगला असावा ‎ लागतो; परंतु येथे त्या उलट चित्र आहे. ‎

बातम्या आणखी आहेत...