आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाने गॅसवरील सबसिडी बंद केली. त्यानंतर घरगुती वापराचे गॅसचे दर वाढतच जावून थेट १ हजार रूपयांपेक्षा अधिक किमतीवर गॅसचे दर स्थिरावले आहेत. या वाढत्या किमतीमुळे उज्ज्वला गॅस ग्राहकांना आता गॅस घेणे परवडत नसल्याने ३५ हजार ग्राहकांपैकी केवळ ७ हजाराच्या आतच ग्राहक गॅसचा वापर करीत आहेत. त्यामुळे आदिवासी महिला पुन्हा चुलीकडे वळत आहेत.
नंदुरबार जिल्हा हा ६७ टक्के आदिवासी जिल्हा आहे. ग्रामीण, आदिवासी महिलांची धुरातून मुक्तता व्हावी,तसेच प्रदुषण रोखले जावे,यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. यापूर्वी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही आदिवासी भागात गॅस शेगडया वाटपाचा सपाटाच लावला होता. परंतु मोफत दिलेले गॅस आता आदिवासी महिलांना न परवडणारा ठरत असून गॅस वापर जवळपास बंद झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.