आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना‎:टंचाई लक्षात घेऊन‎ कामांचे प्रस्ताव द्या‎

नंदुरबार‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील‎ संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन‎ विविध योजनांच्या कामांचे प्रस्ताव‎ तातडीने सादर करण्याच्या सूचना‎ राज्याचे आदिवासी विकास मंत्री‎ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.‎ विजयकुमार गावित यांनी दिल्या.‎ नंदुरबार तालुक्यातील पूर्व‎ भागातील टंचाईग्रस्त गावातील‎ सरपंच, तलाठी, ग्रामसेवक‎ यांच्याशी संवाद साधताना बोलत‎ होते. या वेळी निवासी‎ उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप‎ मुख्य कार्यकारी अधिकारी‎ (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील,‎ कार्यकारी अभियंता नीलिमा मंडपे,‎ तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट‎ विकास अधिकारी जयवंत उगले‎ यांच्यासह रनाळा, मांडळ,‎ खोंडामळी मंडळातील सरपंच,‎ तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध‎ विभागाचे प्रमुख अधिकारी‎ उपस्थित होते.

या वेळी बोलताना‎ मंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार‎ तालुक्यातील पूर्व भागातील काही‎ गावांना उन्हाळ्याच्या दिवसांत‎ पाणीटंचाईचा सामना करावा लागू‎ शकतो. यासाठी संभाव्य‎ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणी टंचाई निवारण्याच्या कामासह‎ विहीर अधिग्रहण, हातपंप, विहीर‎ खोलीकरण, नदी, नाले, तलावांचे‎ गाळ काढणे, नवीन हातपंप बसवणे,‎ हातपंप दुरुस्ती तसेच रोजगार हमी‎ अंतर्गत येणाऱ्या पाणंद रस्ते,‎ घरकुल तसेच विविध योजनांची‎ कामांच्या मागणीचा प्रस्ताव‎ ग्रामपंचायतीने त्वरित सादर करावा.‎ अशा प्राप्त प्रस्तावाला यंत्रणेने‎ त्वरित मंजुरी द्यावी. ज्या गावांना‎ पाणीटंचाई जाणवणार आहे अशा‎ गावांनी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव‎ त्वरित सादर करावा, अशा सूचना‎ देण्यात आल्या.

पाणी योजनांच्या‎ दुरुस्त्या करा‎
पाणीपुरवठा योजनांच्या आवश्यक‎ त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. ज्या‎ ठिकाणावरून पाणीपुरवठा करण्यात‎ येणार आहे, त्या जलस्राेतांचा पुरेसा‎ पाणीसाठा उपलब्ध असल्याची‎ खात्री करावी. त्यानंतरच तेथून‎ पाणीपुरवठा करावा. पर्यावरणांचा‎ समतोल साधण्यासाठी अंगणवाडी,‎ ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र,‎ शाळा, गाव तसेच गावाच्या पडीक‎ जमिनीवर वृक्षारोपण करावे, अशा‎ सूचना मंत्री गावितांनी दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...