आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुर्वेदातील नाडी परीक्षा हे एक शास्त्र आहे. त्याद्वारे अनेक व्याधींचे अचूक निदान तर करता येतेच; पण रुग्णाला भविष्यात होणाऱ्या दुर्धर आजारांचा अंदाजही बांधता येतो, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी येथील नाडी तपासणी व आयुर्वेदिक आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे चेतक फेस्टिव्हल समितीतर्फे आयोजित विशाल योग महोत्सवात या शिबिराला मंगळवारपासून सुरुवात झाली. शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुळकर्णी, चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल पाटील, आचार्य आनंदजी, आचार्य संजीवजी, डॉ.मुकेश योजी, डॉ.महेंद्र शर्मा, डॉ.गजानन कानापनावर, रणवीरसिंह रावल, ग्रामविकास अधिकारी पी.डी. पाटील, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी डिगराळे आदी उपस्थित होते. डॉ.गिरासे म्हणाले की, या प्राचीन शास्त्राचा वापर आजच्या आधुनिक युगातही केला जातो. त्याद्वारे रुग्णचिकित्साही अचूक केली जाते. शरीराचा सूक्ष्म अभ्यास नाडी परीक्षेमुळे होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.