आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मला समाजाने काय दिले, यापेक्षा मी समाजाला काय‎ देऊ शकतो या भावनेतून सेवेची कास धरा : डॉ. नांद्रे‎

नंदुरबार‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला समाजाने काय दिले, यापेक्षा‎ मी समाजाला काय देऊ शकतो या‎ भावनेने युवकांनी समाजाची सेवा‎ करावी. समाजाकडे बघताना‎ सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.‎ समाजातील सर्व जाती-धर्मातील‎ लोकांना आपत्कालीन परिस्थितीत‎ सहकार्य करण्याचे संस्कार राष्ट्रीय‎ सेवा योजना शिबिरांतून केले‎ जातात. या शिबिरांतून स्वतःमध्ये‎ अपेक्षित बदल घडवून स्वावलंबी,‎ सहयोगी व समाजाेपयोगी बना, असे‎ प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई‎ चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या‎ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे‎ संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी‎ केले.‎ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठ आणि येथील‎ जिजामाता शिक्षण संस्थेचे‎ जिजामाता शिक्षण शास्त्र‎ महाविद्यालय यांच्या संयुक्त‎ विद्यमाने वाघोदा येथे आयोजित‎ सात दिवसीय विशेष श्रम संस्कार‎ शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते‎ बोलत होते. ‘राष्ट्रीय समाज सेवा''‎ विभागाच्या फलकाचे अनावरण‎ डॉ.नांद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.‎

राष्ट्रीय सेवा योजना एककाचे‎ विशेष श्रम संस्कार शिबिराचे‎ उद्घाटन सेवानिवृत्त‎ सीआरपीएफ जवान राजेंद्र ठाकूर‎ यांच्या हस्ते करण्यात आले.‎ उपसरपंच सुरेश महिरे, गुलाब‎ नाईक, ग्रामसेवक अविनाश‎ गावित, रासेयोचे जळगाव जिल्हा‎ समन्वयक डॉ.मनिष करंजे,‎ डॉ.संजय शिंगाने, नंदुरबार‎ समन्वयक डॉ.विशाल करपे अादी‎ मान्यवर उपस्थित हाेते.‎

युवकांच्या गुणांना मिळताेय वाव‎
विद्यापीठांतर्गत साहस, उत्कर्ष, प्रेरणा,‎ आव्हान व विशेष श्रमसंस्कार शिबिरे‎ राबवली जातात. उमलते व्यक्तिमत्व, झेप‎ गरुडाची व ध्यास सूर्याचा असणाऱ्या‎ युवकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन देश‎ पातळीवर नेतृत्व करण्याची संधी या‎ शिबिरांमधून मिळते, असे डॉ.शिंगाणे यांनी‎ उद्घाटन प्रसंगी मनाेगतातून सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...