आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपापसांतील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य, सौहार्द वाढीस लागण्यासाठी सलोखा योजना सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्यांकडे १२ वर्षांपासून असणाऱ्या शेतजमीन धारकांच्या अदलाबदल दस्तांसाठी शासनाने ‘सलोखा’ योजना सुरू केली आहे.
त्यासाठी केवळ एक हजार मुद्रांक शुल्क व नोंदणी फी आकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांपर्यंत राहील. पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षापासून असला पाहिजे.
योजनेमुळे शेतकऱ्यांचे हे होणार फायदे शेतजमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमीन धारकांच्या जमीन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील. शेतजमिनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन, वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आपापसातील वादामुळे अनेक शेतजमिनी यापुढे पडीक राहणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.