आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंथन:दुर्गम भागात नद्या काेरड्या, यंदा पाणीटंचाई;‎ नियाेजन करून तत्काळ उपाययोजनांची मागणी‎

नंदुरबार‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळा सुरू होताच धडगाव,‎ अक्कलकुवा तालुक्यातील दोन मोठ्या‎ नद्या व नाले कोरडे पडल्याने तेथे‎ पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू‎ शकते. त्यामुळे आतापासून नियोजन‎ करावे. तीन वर्षांपासून या दाेन्ही‎ तालुक्यात एकही हातपंप मंजूर झालेला‎ नाही. दुर्गम भागात डॉक्टरांच्या‎ गैरहजेरीमुळे कुपोषणाच्या प्रमाणात वाढ‎ होत आहे.

किती डॉक्टर सेवा देतात,‎ असा प्रश्न उपस्थित करत आरोग्य‎ यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी‎ जि.प. स्थायी समितीच्या बैठकीत‎ करण्यात आली.‎ स्थायी समितीची बैठक जि.प.‎ अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या‎ अध्यक्षतेत पार पडली. यावेळी उपाध्यक्ष‎ सुहास नाईक, सभापती हेमलता‎ शितोळे, गणेश पराडके, शंकर पाडवी,‎ संगीता गावित, मुख्य कार्यकारी‎ अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त‎ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार‎ पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी‎ राजेंद्र पाटील उपस्थित होते.‎ बैठक सिंचन, आरोग्य तसेच शिक्षण‎ विषयावर चर्चा झाली. मात्र सभेत‎ नेहमीप्रमाणे खडाजंगी बैठकीत दिसली‎ नाही. सदस्यांनी शांतपणे आपले म्हणणे‎ मांडले. सदस्य रतन पाडवी म्हणाले,‎ धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात‎ पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल.‎ कुंडल व उदय या नद्या व छोटे-माेठे‎ नाले आटले आहेत. त्यामुळे भीषण‎ पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार‎ आहे. बाहेरून अनेक डॉक्टर येतात.‎ नियुक्त झाल्यानंतर वैद्यकीय रजेवर‎ निघून जातात. ते पुन्हा येत नाहीत. या‎ परिस्थितीवर ठोस उपाययोजना‎ करावी, असा मुद्दा मांडला. नवापूर‎ तालुक्यातील खोल विहीर ग्रा.पं.च्या‎ आमसर पाड्याचे विभाजन झाले.‎ त्यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच‎ ठेकेदारांचे बिले वेळेवर निघत नाहीत,‎ यावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.‎

दाेन राखीव सुट्या देण्याची मुभा‎
कोकणात गणपती उत्सवात सुट्या दिल्या जातात.‎ नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठी‎ असल्याने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा हाेताे.‎ त्यासाठी दोन ऐवजी पाच दिवसांची सुटी देण्याची‎ मागणी सी.के. पाडवींनी केली. मार्च महिन्यात सहा व‎ सात रोजी सुट्या असून ५ मार्च रोजी रविवार येत‎ असल्याने आदिवासी बांधवांना सलग तीन दिवस‎ सुट्या मिळतील. जि.प.कडे दोन सुट्या राखीव‎ असल्याने शाळा त्या वाढीव दोन दिवस सुट्या देऊ‎ शकतात. मात्र ही सुटी ऐच्छिक ठेवण्यात आली.‎

हाेळीसाठी सर्व तालुक्यांंंना सुटी द्या‎
होळी सणात युवकांचा मोठा सहभाग असतो.‎ होळी सणावेळी युवकांना चेहरा सजवून होळी‎ नृत्यांमध्ये सहभागी व्हावे लागते. रात्रभर नृत्य‎ केल्याने दुसऱ्या दिवशी थकवा येतो. तसेच‎ होळीची तयारी करण्यासाठी काही दिवस जावे‎ लागते. त्यामुळे होळी सणाला सलग पाच दिवस‎ सुटी द्यावी. तसेच हा नियम सर्व सहा तालुक्यांना‎ लागू व्हावा, तसेच होळी उत्सवासाठी निधी‎ मंजूर करावा, अशी मागणी या बैठकीत‎ चर्चेवेळी करण्यात आली.‎

पदाेन्नतीची प्रक्रिया मार्गी लावा
शिक्षण सेवकावरून नियमित शिक्षक झालेल्यांचे‎ वेतन नियमित होत नाही. त्यांना नियमित वेतन‎ देण्याचीही मागणी झाली. तर प्राथमिक शिक्षकांना‎ पदाेन्नती कधी देणार आहात? असा प्रश्न उपाध्यक्ष‎ नाईक यांनी विचारला असता यादी सामान्य प्रशासन‎ विभागाकडून येईल. सेवा ज्येष्ठतेनुसार लवकरच‎ पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती‎ शिक्षण विभागाकडून देण्यात आली. आठवड्यात‎ हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, अशी अपेक्षा नाईक‎ यांनी व्यक्त केली.‎

आराेग्य विभागाची रिक्त पदे भरा‎
आरोग्य विभागाचे तीन तेरा वाजले आहेत.‎ डॉक्टर ओपीडीला हजर राहत नाहीत. उपस्थित‎ आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यावर ते‎ मिटिंगला गेल्याचे उत्तर मिळते. डॉक्टरांच्या‎ महिन्यातून दोनच मिटिंगा असतात. मग प्रत्येक‎ वेळेस मिटिंगला गेल्याचे ठरलेले उत्तर का दिले‎ जाते? याची चौकशी करणार की नाही, असा‎ सवाल उपस्थित करण्यात आला. आरोग्य‎ विभागात जवळपास २० पदे रिक्त आहेत. ही पदे‎ तत्काळ भरण्याची मागणी करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...