आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सायबर गुन्हे संरक्षण या विषयावर विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या चर्चासत्रास मुंबई येथील इंडिया टेक आयटी कंपनीचे संस्थापक डॉ. हरिश चंदर हे उपस्थित होते. डॉ. चंदर यांनी सायबर हल्ल्यापासून कसे संरक्षण करावे, या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात संगणकाच्या वापर केला जातो. ई-मेल, ऑनलाइन बँकिंगमध्ये होणारे सायबर हल्ले कशा पद्धतीने टाळता येतील याबद्दल त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल हे होते. या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज पेंढारकर यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रा.पंकज पेंढारकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.