आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनानंतर तब्बल दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यानंतर शाळा सुरू झाल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे बसस्थनकाची वर्दळ पूर्णपणे थांबली होती. आता शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याने शाळा पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांनी गजबजू लागल्या आहेत. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार असणाऱ्या एसटी बसेसही नियमित सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा प्रवाशांसह विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने नंदुरबारचे बसस्थानक गजबजू लागले आहे. छाया : नितीन पाटील, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.