आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा ‎:होळतर्फे हवेली गावाचा कचरा‎ प्रश्न सुटला; पाणीही मिळणार‎

नंदुरबार‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरानजीक असलेल्या होळतर्फे‎ हवेली गावातील १६०० घरांना‎ डस्टबिन वाटप करण्यात येत असून‎ त्याचा शुभारंभ रविवारी करण्यात‎ आला. तेथील ग्रामपंचायतीने १२ व्या‎ वित्त आयोगाच्या निधीतून दोन‎ घंटागाड्या खरेदी केल्या असून गुढी‎ पाडव्याच्या मुहूर्तावर घरोघर जावून‎ कचरा गोळा करण्याच्या कामाला‎ सुरुवात हाेईल. येत्या दिवाळीपर्यंत‎ ‘हर घर, नल जल’ योजनेचे काम‎ अंतिम टप्प्यात येऊन या भागातील‎ रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी‎ मिळणार आहे. अस्वच्छतेपासून‎ ग्रामस्थांची गुढीपाडव्यापासून‎ मुक्तता होणार असून पिण्याच्या‎ पाण्याची टंचाई दिवाळीत संपुष्टात‎ येणार आहे. त्यामुळे शहरात नोकरी‎ करणाऱ्या व होळतर्फे हवेलीत‎ राहणाऱ्यांचा संघर्ष संपणार आहे.‎ होळतर्फे हवेली‎ ग्रामपंचायतमार्फत घंटागाडी व‎ कचराकुंडीचे लोकार्पण माजी‎ नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते‎ रविवारी करण्यात आले. पूर्वी‎ शहरापासून लांब असलेले हे गाव‎ आता शहराला जोडले गेले आहे.‎

प्रत्यक्षात हे गाव कागदोपत्री‎ ग्रामपंचायत आहे. गावात सुमारे १‎ हजार ६०० घरे आहेत. गावात‎ कचऱ्याची विल्हेवाट कशी‎ लावायची, असा यक्ष प्रश्न‎ नागरिकांपुढे उभा होता. अखेर‎ डस्टबिनमध्ये हा कचरा गोळा‎ करून तो कचरा गाडीत टाकायचा.‎ तसेच संकलित केलेला कचरा‎ शहराच्या कचरा डेपोत टाकायचा,‎ असे नियोजन झाले. त्यामुळे या‎ गावातील कचऱ्याची समस्या‎ संपुष्टात येणार आहे. नंदुरबार‎ जिल्ह्यात एखादया ग्रामीण भागात‎ डस्टबिन वाटप तसेच घंटागाडी‎ मार्फत कच-याची विल्हेवाट‎ लावण्याचा हा पहिलाच उपक्रम‎ असल्याचे बोलले जात आहे.‎ त्यामुळे स्वच्छ भारत मिशन या‎ उपक्रमाला खऱ्या अर्थाने सुरूवात‎ होणार असल्याने आणि तो बहुमान‎ होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीला‎ मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये‎ आनंदाचे वातावरण पसरले आहे.‎ स्वच्छता व पाणी प्रश्न सुटल्याने‎ सर्वांनी निश्वास साेडला आहे.

घंटागाडी, कचराकुंडीचे‎ झाले लाेकार्पण‎
डुबकेश्वर मंदिर परिसरात हा‎ घंटागाडी व कचराकुंडी लोकार्पण‎ सोहळा रविवारी पार पडला.‎ नंदुरबारच्या माजी नगराध्यक्षा रत्ना‎ रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख‎ राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत‎ काही नागरिकांना प्रातिनिधिक‎ स्वरुपात घरात कचरा‎ संकलनासाठी डस्टबिनचे वाटप‎ केले. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष‎ कुणाल वसावे, माजी सभापती‎ कैलास पाटील, माजी नगरसेवक‎ रवींद्र पवार, दीपक दिघे, चेतन‎ वळवी, प्रमोद शेवाळे, हंसराज‎ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ जिल्हा सचिव नितीन जगताप,‎ युवा सेना तालुकाप्रमुख प्रफुल‎ खैरनार तसेच होळतर्फे हवेलीचे‎ सरपंच मनीष नाईक, उपसरपंच‎ शोभा रवींद्र पवार, ग्रामसेवक‎ विजय पाटील यांच्यासह सर्व ग्रा.पं.‎ सदस्य व कर्मचारी, नागरिक‎ उपस्थित होते.‎

दिवाळीपासून शुद्ध‎ पाणी देखील मिळेल‎
हर घर नल जल योजनेचे ९०‎ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले‎ असून उर्वरित काम लवकरच‎ पूर्ण होणार आहे. दिवाळी‎ सणापर्यंत नंदुरबारला जे वीरचक‎ धरणातील जे शुद्ध पाणी पुरवले‎ जाते, तेच पाणी होळतर्फे‎ हवेलीच्या ग्रामस्थांनाही मिळेल. - रवींद्र पवार, माजी‎ उपनगराध्यक्ष, नंदुरबार न.पा.‎

ग्रामपंचायत हद्दीतील‎ कचरा प्रश्न सुटणार‎
गुढीपाडव्यापासून घंटा‎ गाडीद्वारे कचरा संकलनास‎ सुरुवात करण्यात येणार आहे.‎ घंटा गाडीद्वारे गावात घरोघरी‎ कचरा गोळा करून पालिकेच्या‎ कचरा डेपोत टाकण्यात येणार‎ आहे. त्यामुळे होळतर्फे हवेली‎ ग्रामपंचायत हद्दीतील स्वच्छतेचा‎ प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.-‎ शोभा पवार, उपसरंपच.‎

बातम्या आणखी आहेत...