आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानधन वाढीसह वैद्यकीय रजा, महिला कर्मचाऱ्यांना रजेला खर्चाचे प्रतीपूर्ती देयक मिळावे आदींसह प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक १४ मार्चपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या बाबत संघटनेच्या मार्फत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील गट संसाधन केंद्रात गेल्या ११ वर्षांपासून गट समनव्यक व समुह समनव्यक या पदावर कंत्राटी कर्मचारी काम करीत आहे. परंतु सदरचे कर्मचारी हे अतिशय अल्प मानधनात काम करीत आहेत. जिल्ह्यात पाणी व स्वच्छता विभागात तालुकास्तरावर एकुण २२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्यस्थितीत जिल्ह्यात ९ कर्मचारी काम करीत असून रिक्त कर्मचाऱ्याचा कामाचा अतिरिक्त भारही या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचारी यांनी सन २०१९ मध्ये काम बंद आंदोलन करून तीव्र आंदोलन केले होते. मात्र चार वर्ष उलटून मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी संघटनेचे राज्य सचिव जयंत वर्मा, जिल्हा अध्यक्ष अनिल कोळी, जिल्हा सचिव यशवंत गांगुर्डे, सखाराम पवार, वसंत वसावे, अरुण शेंडे, शांताराम वळवी, विजयसिंग वळवी, दातक्या पाडवी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.