आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:3 वर्षापूर्वी निधी मिळूनही रस्ता नसल्याने‎ रावलापाणी स्मारकाचे काम अद्याप अपूर्ण‎

सुनील सूर्यवंशी | तळोदा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपुड्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने‎ लिहिल्या गेलेल्या रावला पाणी येथील‎ शहिदांच्या स्मारकासाठी निधी येऊन तीन‎ वर्षे उलटली तरी हे स्मारक अजून पूर्ण‎ झालेले नसल्याने या कामाला गती द्यावी‎ अशी मागणी होत आहे.‎ इंग्रजांनी धडगाव तालुक्यातील‎ रावलापाणी परिसरात २ मार्च१९४३ मध्ये‎ केलेल्या गोळीबारात १५ आदिवासी‎ बांधवांना हुतात्मे पत्करावे लागले होते.‎ तसेच यात २८ जण जखमी झाले होते. या‎ ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार म्हणून‎ रावलापाणी परिसरात ऐतिहासिक‎ घटनास्थळी दगडांवर गोळ्यांच्या निशाणी‎ अजून देखील आहेत. तत्कालीन नंदुरबार‎ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे‎ पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी २ कोटी‎ ६७ लाख निधी इतका निधी मंजूर केला‎ होता.

मात्र तब्बल ३ वर्षे उलटूनही प्रशासन‎ पातळीवर कामाला गती देण्यासाठी‎ कोणत्याही हालचाली संबधित‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विभागाकडून करण्यात येत नाही. या‎ भागात बांधकाम करताना पक्का रस्ता‎ नसल्याने बांधकाम साहित्य आणणे‎ अतिशय खडतर असल्याने हे स्मारक‎ तयार करण्यासाठी अधिक वेळ लागत‎ आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना‎ विभागाकडून विचारणा केली असता‎ त्यांनी सांगितले की रावला पाणी या‎ ऐतिहासिक स्थळी जाण्याच्या रस्ता हा‎ रस्ते विकास आराखडा अंतर्गत येत‎ नसल्याकारणाने या रस्त्यासाठी लागणारा‎ निधी मंजूरसाठी तांत्रिक अडचणी आहेत.‎

रस्ता नसल्याने येताय अडचणी
रावला पाणी हे ऐतिहासिक स्थळातून या‎ स्थळाला भेटी देण्यासाठी असंख्य लोक‎ येतात. मात्र रस्ता नसल्या कारणाने त्यांना‎ पाच ते सहा किलोमीटर पायपीट करत या‎ ठिकाणी यावे लागते. या भागात रस्ते‎ व्यवस्थित नसल्याकारणाने स्मारकासाठी‎ येणारे बांधकाम साहित्य आणताना‎ अडचणीच्या सामना करावा लागतो.‎ त्यामुळे रावला पाणी गावापर्यंत येणारा‎ रस्ता हा डांबरीकरण करावा.‎ - रतीलाल पावरा, सरपंच, रावलापाणी‎

बातम्या आणखी आहेत...