आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मानी संकट:अवकाळीची हजेरी; तळोदा शहरात‎ तुरळक गारा, रब्बी हंगाम संकटात‎

नंदुरबार‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार शहरासह तळोदा, नवापूर, शहादा‎ तालुक्यात सोमवारी सायंकाळी विजांच्या‎ कडकडाटसह हजेरी लावली. सुमारे‎ अर्धातस पावसाने हजेरी लावली. यामुळे‎ काही काळ वीजपुरवठा खंडित झाला‎ होता. तर या पावसामुळे रब्बी हंगाम‎ पूर्णपणे धोक्यात आला असून पुन्हा १५‎ मार्चपर्यंत पावासाची शक्यता आहे. तर‎ तळोदा शहरात उशिरा तुरळक ठिकाणी‎ गारांचा पाऊस झाला.‎ शहरासह जिल्ह्याच्या तापमानात वाढ‎ झाली असून दिवसभर ढगाळ वातावरण‎ होते. यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त‎ तापमान सोमवारी नोंदवले गेले. किमान‎ तापमान १९.५ अंश तर कमाल तापमान‎ ३६.१ अंश सेल्सिअसवर पोहचले. ढगाळ‎ वातावरणामुळे उकाडा जाणवू लागला‎ असून १३, १४ व १५ मार्च दरम्यान हलक्या‎ पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.‎ त्या आधीच सोमवारी सायंकाळी पावसाने‎ हजेरी लावली. त्यामुळे मिरची पथारीचे‎ मालक चिंतेत आहेत. गत आठवडयात‎ पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे‎ फार मोठे नुकसान झाले. पन्हा पुढच्या तीन‎ दिवसांत पावसाची शक्यता आहे.‎

त्यामुळे या पावसाचा फटका मिरची‎ पथारीला बसू शकतो. भारतीय हवामान‎ विभागाने वर्तवलेल्या हवामान‎ अंदाजानुसार १३ ते १५ मार्च दरम्यान‎ नंदुरबार जिल्हयात पावसाची शक्यता‎ वर्तवली आहे. वादळी वाऱ्यासह हलका‎ पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त‎ करण्यात आला आहे. त्यामुळे‎ शेतकऱ्यांनी हरभरा, गहू या पिकांची‎ काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी,‎ असा सल्ला कोळदा येथील जिल्हा‎ कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.‎

मिरचीचा‎ हंगाम‎ संपण्यावर
मिरचीची पिकांची यंदाच्या हंगामात सांगता होत आहे. त्यामुळे मिरची पथारीवर कमी मिरची वाळायला‎ टाकण्यात आली आहे. जर जोरदार पाऊस पडला तर मिरची पथारीवरील मिरचीला धोका पोहचू शकतो.‎ मिरचीचे किती नुकसान होऊ शकेल, हे आज सांगू शकत नाही.‎ संदीप जायस्वाल, मिरची व्यापारी, नंदुरबार

या पिकांना आहे धोका‎
नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा,‎ धडगाव, शहादा व तळोदा या सर्वच‎ तालुक्यात पावसाची शक्यता‎ वर्तवण्यात आली आहे. गहू,रब्बी‎ मका, हरभरा, उन्हाळी मुग, भुईमुग,‎ तीळ,बाजरी, पपई,केळी, मिरची या‎ सर्वच पिकांच्या बाबतीत कृषी सल्ला‎ देण्यात आला आहे. गहू, रब्बी‎ मका,ज्वारी,हरभरा ही पिके परिपक्व‎ झाली असतील तर पिकांची कापणी‎ करून सुरक्षित जागेवर पिक ठेवावे.‎ उन्हाळी मुगाची पेरणी १५ मार्चनंतर‎ करावी. वादळी पाऊस येणार‎ असल्याने गुरांना सुरक्षित जागेवर‎ ठेवावे, असा इशारा दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...