आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमीपूजन कार्यक्रम:शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी ; पालकमंत्री डॉ. विजयकुमार‎ गावित यांचे प्रतिपादन

नंदुरबार‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या‎ माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत‎ पाणी आणणार असल्याचे प्रतिपादन‎ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा‎ जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार‎ गावित यांनी केले.‎ नंदुरबार तालुक्यातील तलवाडे, बलवंड,‎ खर्दे. खु. येथील सभागृह व रस्ता‎ क्राँक्रीटिकरण अशा विविध विकास‎ कामांचे भूमीपूजन कार्यक्रम आज झाला.‎ या वेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते.‎ खासदार डॉ. हिना गावित, सरपंच‎ (बलवड) सागर पाटील, सरपंच‎ (तलवाडे) ताराबाई राजपूत, सरपंच‎ (खोंडामळी) युवराज देसले, सरपंच‎ (भोणे) पावबा धनगर, सरपंच नितीन‎ पाटील (खर्दे. खु.) माजी जि.प.सदस्य रवी‎ पाटील, सागर तांबोळी उपस्थित होते.‎

या वेळी बोलताना मंत्री डॉ. गावित‎‎‎‎‎‎‎‎‎‎ म्हणाले, आपल्या जिल्ह्यात नद्या व‎ धरणामध्ये पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध‎ असून हे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या‎ शेतापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार‎ असून या भागात एकदाची पाण्याची सोय‎ झाल्यावर येथील शेतमालावर प्रक्रिया‎ करण्यासाठी या भागात लहान मोठे‎ कारखाने सुरू करू. यामुळे येथे‎ रोजगाराची संधी उपलब्ध होऊन स्थलातर‎ थांबेल.

ज्या गरीब व्यक्तींना घरे नाही‎ अशांना आदिवासी विकास विभागामार्फत‎ मोठया प्रमाणात घरकुलाचे काम घेण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎ येत असून ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव‎ सर्व आदिवासी बांधवांना १०० टक्के घरे‎ देण्यात येईल. या भागातील विविध‎ विकासकामासाठी पुढील वर्षी निधी‎ उपलब्ध करुन देण्यात येईल. केंद्र सरकारने‎ नवीन डी. पी, नवी सबस्टेशन सुरू करणे‎ तसेच जुन्या वीजतारा बदलण्यासाठी निधी‎ दिला असल्याचे त्यांनी सांगितले.‎ सर्वसाधारण श्रेणीतील नागरिकांनी रोजगार‎ हमी योजनेचे कार्ड व कामगार कार्ड काढून‎ शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन‎ त्यांनी यावेळी केले.‎

बातम्या आणखी आहेत...