आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान उच्चांकीच:दवाखान्यात राेज 15 टक्के रुग्ण उष्माघाताचे, काहींना उन्हामुळे येताहेत झटके‎; खासगी डाॅक्टरांकडेच अधिक ओढा

जळगाव‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे तापमान ४४ अंशांच्या पुढे‎ गेले अाहेे. परिणामी उष्माघाताचा‎ धोका वाढला आहे. सध्या जळगाव‎ शहरात चक्कर, डोकेदुखी,‎ मळमळ-उलटी, पोटात वेदना,‎ गोंधळलेली अवस्था ही सामान्य‎ सुरुवातीची लक्षणे रुग्णांत पाहायला‎ मिळताहेत.

दररोज ओपीडीत सुमारे‎ १० ते १५ टक्के रुग्ण हे उष्माघाताचे‎ येत आहेत. यातही दाेन ते तीन टक्के‎ रुग्णांना झटके येताहेत. याकडे‎ दुर्लक्ष केल्यास जीव गमावण्याच्या‎ धोका आहे. मात्र, असा रुग्ण जर‎ समोर दिसला तर लगेच त्याचे अंग ‎ ‎ पुसून त्याला थंड हवेत न्यावे व‎ तत्काळ डॉक्टरांकडे हलवावे, असा ‎ ‎ सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला .‎

तीव्र उन्हाने शरीरातील तापमान‎ नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसची ‎ ‎ यंत्रणा कोलमडून पडते आणि‎ उष्माघात होतो. जीएमसीत ३० ते ४० ‎ ‎टक्के तर खासगी रुग्णालयात १० ते‎ १५ टक्के रुग्ण हे उष्माघाताची‎ लक्षणे असल्याचे समाेर येते अाहे.‎

उष्माघाताची लक्षणे

उच्च ताप, कमी‎ रक्तदाब, चक्कर‎ येणे, उलट्या होणे,‎ स्नायूंमध्ये कडकपणा,‎ सतत घाम येणे,‎ अशक्तपणा, त्वचेवर‎ पुरळ, बेशुद्ध होणे,‎ डोकेदुखी, श्वास‎ घेण्यास समस्या, भीती‎ आणि अस्वस्थता.‎

उष्माघाताची प्राथमिक लक्षणेे रुग्णांत दिसताहेत. सध्या मेंदूच्या आजाराचे रुग्ण‎ वाढले असून, वाढत्या उन्हामुळे दाेन टक्के मेंदू अाजाराचे रुग्ण दिसून येत आहेत.‎ वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

- डॉ. निखिल पाटील, फिजिशियन, जळगाव‎

उष्माघात आणि ताप येणे या भिन्न प्रक्रिया आहेत. ताप‎ येण्यामध्ये शरीराचे तापमान नेहमीहून अधिक राहते.‎ उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान ३८.१पेक्षा अधिक किंवा‎ त्याहून अधिक तापमानाला स्थिर राहणे. दुपारी शरीराचे‎ तापमान ३७.७० सेल्सिअस असते. उष्माघातात हे तापमान‎ ४० सेल्सिअस होऊन जीवघेणे ठरते हे लक्षात ठेवावे.‎

यांना आहे उष्माघाताचा धोका‎

जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव‎ निकामी होतात. उष्माघात हा प्रामुख्याने नवजात शिशू,‎ लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ‎ आजारी व मद्यप्राशन करणाऱ्यांत आढळतो. हृदयरोग,‎ फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च‎ रक्तदाब, मधुमेहींना उष्माघाताचा त्रास अधिक हाेताे.‎

असा करा उष्माघातापासून बचाव‎

​​​​​​​उन्हात बाहेर निघू नका , छत्री वापरा, चहा-‎ कॉफी किंवा गरम पदार्थ टाळा, दिवसातून तीन‎ लिटर पाणी प्या, दीर्घकालीन काम टाळा,‎ उष्माघात झाल्यास डॉक्टरांना भेटा, साखर‎ असलेले पेय पिणे टाळा, सैल कपडे घाला.‎