आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेचा सुगंध:अर्ध्या शहरातून 1987 श्री सेवकांनी पाच‎ तासांमध्ये गाेळा केला 103 टन कचरा‎

जळगाव‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छ व‎ सुंदर शहरासाठी जनजागृती निर्माण‎ व्हावी याकरिता रेवदंडाच्या डॉ.‎ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे‎ बुधवारी शहरात महास्वच्छता‎ अभियान राबवण्यात आले. यात पाच‎ तासांत १९८७ श्री सेवकांनी शहरातील‎ विविध भागात स्वच्छता करत १०३ टन‎ कचरा संकलित केला. संकलित‎ केलेला कचरा नेरीनाक्या परिसरात‎ जमा करण्यात आला आहे. त्याची‎ आव्हाणे येथील डंपिंग ग्राऊंड येथे‎ विल्हेवाट लावण्यात आली.‎ अभियानात युवकांचा सहभाग‎ लक्षणीय हाेता.‎ धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे‎ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या‎ जन्मशताब्दीनिमित्त शहरासह‎ धरणगाव, जामनेर, एरंडोल येथे हे‎ अभियान राबवण्यात आले. सकाळी ७‎ वाजेपासूनच श्री सेवक आपल्या‎ नियुक्तीच्या ठिकाणी एकत्र आले हाेते.‎

कचरा उचलण्यासह ट्रॅक्टर व अन्य वाहनात‎ टाकण्यासाठी घमेली, पावडे, ग्लोजही‎ प्रतिष्ठानकडूनच पुरवण्यात आली होती.‎ शिस्तबद्ध पद्धतीने कुठलाही आवाज, गोंधळ‎ न करता श्री सेवकांचे कार्य सुरू होते.‎ शहरातील शाळा, महाविद्यालयांतील‎ परिसरासह शासकीय इमारती, सिंधी कॉलनी,‎ शेरा चौक ते लढ्ढा फॉर्म समोरील रस्ता पूर्ण‎ परिसर, कालिका माता मंदिर ते नेरीनाका,‎ महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट‎ आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक व मुख्य‎ बाजारपेठ, जिल्हापेठेतील काही भागात‎ स्वच्छता करण्यात आली. मनपातर्फे कचरा‎ वाहून नेण्यासाठी २५ ट्रॅक्टर व प्रतिष्ठानातील‎ सदस्यांनीचीही १५ छोटी वाहन कार्यरत होती.‎

जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात
अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून‎ मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री सुनील‎ महाजन, आरोग्य उपायुक्त उदय पाटील, भरत सपकाळे,‎ भगत बालाणी, मनोज चौधरी यांनी श्रीफळ फोडून केली.‎ नगरसेवक प्रवीण कोल्हे, इब्राहिम मुसा पटेल, नवनाथ‎ दारकुंडे व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.‎

श्री सेवकांची‎ १८ पथके‎
मोहिमेसाठी १९८७ श्री सेवकांची १८ पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात सुमारे ५० स्वयंसेवक सहभागी‎ होते. शहरातील बहुतांश भागात शिस्तीत व शांततेत स्वच्छतेचे कार्य करताना कार्यकर्ते दिसत होते. हातमोजे, गमबूट,‎ मास्क, झाडू आणि इतर साहित्य घेऊन हे कार्यकर्ते मनोभावे सेवा करीत असल्याच चित्र दुपारपर्यंत होते. या कार्यात श्री‎ सेवकांसह मजूर, शेतकरी, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला हाेता.‎

बातम्या आणखी आहेत...