आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात सुरू आहे. यात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध बालनाट्य सादर होत आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातून विविध केंद्रातून विजेते ठरलेले २३ बाल नाटके सादर होत असून, गुरुवारी ७ नाटके सादर झाली. स्पर्धेत गुरुवारी ‘जाईच्या कळ्या'', ‘हलगी सम्राट'', ‘रेस टू'', ‘या चिमण्यांनो परत फिरा रे'', ‘खिडकी'', ‘इस्कोट'' व ‘राखेतून उडाला मोर'' ही सात बाल नाटके झाली. यात हलगी सम्राटने धम्माल केली.
दरम्यान, शुक्रवारी या बालनाट्य स्पर्धेचा अंतिम फेरीचा शेवटचा दिवस आहे. यात सकाळी ११ वाजता ‘आम्ही ध्रुव उद्याचे'', दुपारी १२.१५ वाजता ‘शिमी'', दुपारी १.३० वाजता ‘माकड चाळे'', दुपारी २.४५ वाजता ‘बळी'', दुपारी ४ वाजता ‘वारी'', सायंकाळी ५.३० वाजता ‘इथे भुते राहतात'' हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.