आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरामध्ये असलेला ताणतणाव, आर्थिक अडचणी, कोरोना काळात आलेला एकलकोंडेपणा, मोबाइलच्या अतिवापरामुळे बालमनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बालमनोरुग्णांच्या संख्येत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोना काळात संपूर्ण जगावर बंधने आली होती. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे प्रत्येक जण घरात होता. घरात राहून लहान मुलांवर याचे दुष्परिणाम झाले आहेत. मुलांमध्ये एकलकोंडेपणा त्यासोबतच मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये ५ ते १५ वयोगटातील मुला-मुलींमध्ये मानसिक आजार दिसून येत आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्येही मनोरुग्णांचा समावेश होत आहे. दरम्यान, पालकांनी घरात संवाद वाढवून मोबाइल स्वतः बाजूला ठेवला तर पुन्हा हे प्रमाण कमी होईल, असे जीएमसीच्या मनोविकार विभागाच्या प्रमुख डॉ. पूर्वा मणेरीकर यांनी सांगितले.
पालकांमधील विसंवाद चिंतेचे आहे कारण लहान मुलांना कुठली जबाबदारी नसली तरी त्यांच्यावर मानसिक ताणतणाव येतो. सभोवतालच्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटना, घरामध्ये होणारे संवाद व घडामोडींवरती मुलांचं लक्ष असत. या घटनांचा व घडामोडींचा परिणाम या बालमनावरती पटकन होतो. पालकांतील विसंवाद व चिंता हही मुलांच्या मनावर परिणाम करते. लॉकडाऊननंतर घरांमध्ये आलेल्या आर्थिक अडचणी व याबद्दल चर्चा करणाऱ्या आई-वडिलांच्या गप्पा ऐकून मुलांच्या मनावरही परिणाम हाेताे.
ही आहे मुलांमध्ये दिसणारी प्रमुख लक्षणे आई-वडिलांचे न ऐकणं, चिडचिड करणं, मध्येच हिंसक वागणं, विनाकारण त्रास, राग येणे, चिडचिड करणे, बडबड करणे, किंवा अगदी शांत राहणं यासारखी लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत, असे डाॅक्टरांकडून सांगण्यात येते आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.