आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎दिव्य मराठी विशेष:राेजगार मेळाव्यात जागा 2059, उमेदवार‎ 715, आॅफर लेटर दिले फक्त 82 जणांना‎

जळगाव‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व‎‎ उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव‎ व‎ शासकीय अभियांत्रिकी‎ महाविद्यालय,‎ जळगाव यांच्या‎ संयुक्त विद्यमाने पंडित‎ दीनदयाळ‎ उपाध्याय विभागीय रोजगार‎‎ मेळाव्याचे शनिवारी शासकीय‎‎ अभियांत्रिकी महाविद्यालयात‎ आयाेजन करण्यात आले.‎ मेळाव्यासाठी विविध १० कंपन्यांनी‎ २०५९ जागा उपलब्ध केल्या होत्या.‎ प्रत्यक्षात मेळाव्यास केवळ ७१५‎ रोजगारार्थींनी हजेरी लावली. त्यात‎ हिताची अॅस्टिमो ब्रेक सिस्टम ई. प्रा.‎ लि. बांभोरी या एकाच कंपनीने ८२‎ जणांना ऑफर लेटर दिले. इतर‎ कंपन्यांनी ६१७ रोजगारार्थींची‎ प्राथमिक निवड केल्याचा दावा‎ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व‎‎ उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केला.‎ मेळाव्यासाठी‎ विभागाचे‎ www.mahaswayam.gov.in‎ या संकेतस्थळावर नाव नोंदणी‎ केलेल्या उमेदवारांना‎ रोजगार‎ मेळाव्यात सहभागी हाेता येणार‎‎ होते; परंतु प्रत्यक्ष हजर‎ झालेल्यांनाही मुलाखतीची संधी‎ देण्यात आली.

दरम्यान, जिल्हा‎ कौशल्य विकास रोजगार व‎‎ उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गेल्या १५ दिवसांपासून रोजगार‎ मेळाव्याच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी‎ जिल्ह्यात वाहने फिरवली.‎ विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले.‎ सोशल मीडियातून प्रचार केला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तरीदेखील जेवढ्या जागा उपलब्ध‎ होत्या तेवढेही विद्यार्थी मेळाव्याला‎ हजर राहिले नाही. विद्यार्थ्यांनी‎ मेळाव्याकडे पाठ का फिरवली?‎ याचा शाेध घ्यावा लागणार आहे.‎

अशी आहे दुहेरी परिस्थिती‎
काही विद्यार्थी रोजगार मेळाव्यातून नाराज होऊन निघून गेले. काही कंपन्यांचे‎ प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखती न घेता केवळ बायोडाटा गोळा करतात. नंतर‎ बोलावले जाईल अशी उत्तरे देतात. यामुळे जागेवर नोकरी मिळवण्यासाठी‎ आलेल्या उमेदवारांचा हिरमोड होतो. तयारी करून आले असतानाही त्यांना‎ मुलाखतीसाठी संधी मिळत नाही. हा मेळावा म्हणजे औपचारिकता‎ असल्याचेही मत काही उमेदवारांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले. तर‎ मेळाव्यात मुलाखती होतात, कंपन्या गरजेनुसार विद्यार्थ्यांनी निवड करतात.‎ काही रोजगारार्थींना नंतर बोलावतात, अशी माहिती आयाेजकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...