आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:सिंधी समाजाच्या 88 बटूंना दिले‎ समाजाचे ऋण फेडण्याचे संस्कार‎

जळगाव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधी समाजाचे आराध्य दैवत संत बाबा‎ गेलाराम साहेब यांच्या ९३व्या‎ जन्मोत्सवाच्या निमित्ताने रविवारी सिंधी‎ कॉलनीतील सेवा मंडळात समाजातील‎ पाच ते २५ वर्षापर्यंतच्या अविवाहीत ८८‎ मुलांवर हिंदू धर्माप्रमाणे वैदीक पद्धतीने‎ जनेऊ संस्कार करण्यात आले. यावर्षी‎ संस्कारात सहभागी बटूंचा उच्चांक‎ राहिला. दिवसभरात विविध धार्मीक‎ कार्यक्रमांसह शोभायात्रा, संताची‎ उपस्थिती हाेती. शोभायात्रेत महिला,‎ ज्येष्ठ, युवकांनी भजने, नृत्य सादर केले.‎ अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टने या‎ उत्सवाचे आयाेजन केले हाेते. पहाटे‎ पाच वाजता संत बाबा हरदासराम साहेब‎ व संत बाबा गेलाराम यांच्या देवरी साहेब‎ समाधीला पंचामृत स्नान करण्यात‎ आला. सकाळी १० वाजता सेवा‎ मंडळापासून भव्य शोभायात्रा काढण्यात‎ आली.

त्यात सर्व बटूंचा सहभाग दिसून‎ आला. बटूंसह महिला, ज्येष्ठ नागरिक‎ भजनात तल्लीन झाल्याचे चित्र होते.‎ सजवलेल्या बग्गीवर संत हरदासराम‎ साहेब यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात‎ आली होती. दुपारी सेवा मंडळात‎ प्रत्येक सहा बटुंमागे एक पुरोहित‎ याप्रमाणे ८८ बटूंवर पुरोहितांच्या‎ मंत्रोच्चारात जनेऊ संस्कार करण्यात‎ आले. संत कंवरराम यांचे पंतू साई‎ राजेशकुमार ( अमरावती) व बाबा‎ संत गेलाराम यांचे शिष्य देविदास भाई‎ या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम‎ झाला. त्यांनी बटूंना आशिर्वाद दिले.‎ या उपक्रमास देशभरातील विविध‎ प्रांतातून समाजबांधव सहभागी झाले.‎

प्रबाेधनपर नाटिका : सायंकाळी समाजातील युवक‎ व बालकलाकारांनी ‘एक शाम बाबा के नाम’ ही प्रबाेधनपर‎ नाटीका सादर करण्यात आली. समाजातील प्रत्येकाने दान,‎ धर्म, संस्काराचे पालन करीत आई वडीलांची सेवा करावी‎ असा संदेश देण्यात आला. सेवामंडळ अध्यक्ष दयानंद‎ विसरानी, अशोक मंधान, रमेश मतानी, राम कटारिया,‎ भगत बालाणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या सामाजिक‎ कार्यक्रमाच्या नियाेजनासाठी परिश्रम घेतले.‎

बटूंनी केला संकल्प‎
ब्रम्ह, विष्णू आणि महेश यांचे‎ प्रतिक असलेल्या धाग्याला उजव्या‎ हाताच्या खांद्यावरून भुजेच्या‎ खाली घालण्यात आले. हा बंध‎ बांधून देवऋण, पितृऋण व‎ ऋषीऋण फेडण्याचा संकल्प जनेऊ‎ संस्काराद्वारे बटूंना देण्यात आला.‎ सर्व संताच्या प्रतिमापूजनासह‎ आरती पुरोहितांसह बटूंच्या हस्ते‎ झाली. जनेऊ संस्कार झाल्याशिवाय‎ विवाह करता येत नसल्याने संस्कार‎ न झालेले २५ वर्षापर्यंतचे युवक या‎ कार्यक्रमात सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...