आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च शिक्षणात आदिवासी आणि मुस्लिम समाजाचे प्रमाण पाच टक्के पेक्षा जास्त नाही, ही खेदाची बाब आहे. उच्च शिक्षणासाठी सर्व समावेशकतेचे धोरण अवलंबले पाहिजे. विद्यापीठीय विविध विद्याशाखांचा जर विचार केला तर वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान शाखांच्या तुलनेत सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निम्न होता; परंतु याच विद्याशाखेतील पदवीधर हा समाजाभिमुख शिक्षण घेऊन समाज बांधणीसाठी काम करतो आहे, असे मत माजी कुलगुरू प्रा. डॉ. के. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘पुढील २५ वर्षांतील आपल्या कल्पनेतील विद्यापीठ’ ही एकदिवसीय कार्यशाळा झाली. या वेळी प्रा. पाटील म्हणाले की, स्वप्नातील विद्यापीठ निर्माण करण्यासाठी सर्वांनी स्वप्न पाहावे. येणाऱ्या काळात रोजगारक्षम आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण पद्धती अंगीकारावी लागेल, असे सांगितले. प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी तर बीजभाषक म्हणून प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत मत मांडले. या वेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.