आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाश्वत:अमृत पाणी योजना;‎ खर्च 85 टक्क्यांपुढे‎, मलनिस्सारणाचा 98 टक्के निधी खर्च‎, अंमलबजावणी रखडलेलीच

जळगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ गेल्या चार ते पाच वर्षांपासून ‎ ‎ शहरात राबवण्यात येणाऱ्या‎ अमृत अभियानातील दाेन्ही‎ योजना केव्हा पूर्णत्वास येतील ‎याबाबत ठामपणे सांगता येत‎ नाही. मात्र खर्चाचे आकडे‎ पाहता योजना पूर्णत्वास‎ आल्याचे चित्र आहे.‎ पाणीपुरवठा याेजनेचा‎ आतापर्यंत ८५ टक्के खर्च‎ झाला असून, मलनिस्सारण ‎योजनेचा ९८ टक्के निधी खर्च ‎ ‎ झाला आहे.

‎ जळगाव शहरात अमृत ‎अभियानांतर्गत पाणीपुरवठा‎ योजना २०१८-१९ पासून तर ‎मलनिस्सारण योजना २०१९-२० ‎पासून राबवण्यात येत आहे. या ‎दोन्ही योजनांसाठी चोवीस ‎ ‎ महिन्यांचा कार्यकाळ निश्चित ‎ केला होता. मात्र चार ते पाच‎ वर्षे उलटायला आले तरी‎ अजून योजना पूर्ण होऊ‎ शकलेल्या नाहीत. योजना‎ केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न‎ होताच पुढच्या महिन्याची‎ घोषणा होत आहे. एकीकडे‎ ‎योजना अंमलबजावणी केव्हा‎ सुरू होईल आणि सेवा केव्हा‎ मिळेल याची शाश्वती नाही.‎

असा झाला खर्च‎

पाणीपुरवठा योजनेसाठी‎ २०१८-१९ मध्ये ६९ कोटी ६६‎ लाख रुपये, २०१९- २० मध्ये ५‎ कोटी ७२ लाख रुपये,‎ २०२०-२१ मध्ये ३९ कोटी १७‎ लाख रुपये, २०२१-२२ मध्ये ३९‎ कोटी ५० लाख रुपये,‎ २०२२-२३ मध्ये ६२ कोटी ७१‎ लाख रुपये असा पाच वर्षांत‎ २१६ कोटी ७७ लाख ७७ हजार‎ रुपये खर्च झाला . खर्चाची‎ आकडेवारी ८५.६० % आहे.‎ मलनिस्सारण याेजनेसाठी‎ २०१९- २० मध्ये ८ कोटी २८‎ लाख रुपये, २०२०-२१ मध्ये ९५‎ कोटी ३३ लाख रुपये,‎ २०२१-२२ मध्ये ५९ कोटी ४४‎ लाख रुपये, २०२२-२३ मध्ये ३४‎ कोटी ८३ लाख रुपये असा‎ पाच वर्षांत १९७ कोटी ८९‎ लाख ०९ हजार रुपये खर्च‎ झाला आहे. खर्चाची‎ आकडेवारी ९८.३३ % आहे.‎