आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना एक मार्चपर्यंत परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. सध्या प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी ४९ दिवसांचा कालावधी उरला आहे.
तसेच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संधी हुकू नये यासाठी बोर्डाकडून वारंवार मुदतवाढ दिली जाते, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली. दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिविशेष विलंब शुल्कासह १३ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत परीक्षा फॉर्म भरता येईल. तर बारावीसाठी विद्यार्थ्यांना ४ ते २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.