आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची परीक्षा:झेराॅक्सची दुकाने बंद असल्यामुळे शेतात‎ बसून पालकांनी हाताने लिहिल्या काॅप्या‎

जळगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजीच्या पेपरला कॉप्या पुरवण्यासाठी‎ चांगलीच चढाओढ सुरू असताना यावल‎ तालुक्यातील चिंचोली गावातील‎ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात‎ धानोरा व चिंचोली गावातील तरुणांत‎ तुंबळ हाणामारी झाली होती. या‎ कारणामुळे सोमवारी गणिताच्या पेपरला‎ बाहेरून कॉपी पुरवणे कठीण झाले होते.‎ शाळेच्या चारही बाजूने तगडा पोलिस‎ बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.‎ शेवटच्या २० मिनिटांत मात्र हा बंदोबस्त‎ शिथिल झाल्याने काही पालकांनी‎ विद्यार्थ्यांपर्यंत कॉप्या पोहोचवल्या. तत्पूर्वी‎ प्रत्येक वर्गात शांततेत कॉपी सुरू होती.‎

झेराॅक्सची दुकाने बंद असल्याने पालकांनी‎ शेतात बसून हाताने काॅप्या लिहून त्या‎ पुरवल्याचे प्रकर्षाने समाेर आले.‎ सोमवारी दहावीचा बीजगणित‎ विषयाचा पेपर झाला. चिंचोलीच्या शाळेत‎ इंग्रजीच्या पेपरवेळी कॉप्यांचा पाऊस‎ पडला.

शाळेच्या मागच्या बाजूला‎ असलेल्या केळीच्या शेतातून पालक‎ इमारतीपर्यंत पोहोचून कॉपी पुरवत होते.‎ कॉपी पुरवण्याच्या स्पर्धेतून येथे काही‎ तरुणांमध्ये हाणामारी झाली. परिणामी सोमवारी‎ बंदोबस्त वाढवला होता. पालक केळीच्या‎ शेतात थांबून होते. तर दर पाच मिनिटांनी पोलिस‎ शेतात येऊन त्यांना हुसकावून लावत होते.‎ वर्गात कॉपी सुरू आहे, शिक्षक सर्व उत्तरे सांगत‎ आहे, गर्दी करू नका अशा सूचना पोलिस देत‎ होते. तुम्ही भांडण करणाऱ्यांना पकडा, इथे‎ आम्ही शांततेत मुलांना कॉपी देतो आहे, आमचे‎ भांडण नाही, अशी उत्तरे काही जणांनी दिली.‎

शेतात, रस्त्यावर हाेती गर्दी‎
चिंचाेली गावात दुकानदारांच्या‎ नातेवाइकांकडे कुणाचे तरी निधन झाले‎ होते. या मुळे झरॉक्स काढता येत नव्हती.‎ परिणामी अनेक पालक, तरुणांनी शाळेच्या‎ बाहेर रस्त्यावर, शेतात बसून हाताने उत्तरे‎ लिहून त्या कॉपी वर्गात पाठवण्याचे प्रयत्न‎ केले. परीक्षा केंद्राच्या बाजूला असलेल्या‎ शेतातून खिडक्यांतून काॅप्या पुरवल्या.‎

अर्थनियोजनाचा यंदा फायदा‎
सोमवारी झालेला इयत्ता दहावीचा गणिताचा‎ पेपर हा कृतिपत्रिकेनुसार होता. काठिण्य‎ पातळी साधारण असल्याने सर्वसामान्य‎ विद्यार्थ्यांना सहज सोडवता येईल, अशा‎ स्वरूपाचा हा पेपर होता. कोरोना काळात‎ वगळण्यात आलेला अर्थनियोजन भाग‎ यंदाच्या कृतिपत्रिकेत समाविष्ट करण्यात‎ आला होता. प्रश्न क्रमांक एक व प्रश्न‎ क्रमांक दोनमध्ये या प्रकारातील प्रश्नांचा‎ समावेश होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोपा‎ गेला. ज्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा गांभीर्याने‎ दिली अशा विद्यार्थ्यांना या पेपरला सहज पूर्ण‎ गुण मिळवता येणे शक्य हाेणार आहे.‎- व्ही. आर. कोल्हे ,‎ उपशिक्षक, का. ऊ.‎ कोल्हे विद्यालय, जळगाव‎

बातम्या आणखी आहेत...