आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी‎:आसाेदा बससेवेसाठी रेल्वेच्या‎ भिंती जवळून काढणार मार्ग‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाेदा रेल्वेगेट बंद झाल्याने या‎ भागातील आठ गावांची बससेवा बंद‎ करण्यात आली आहे. त्यामुळे हजाराे‎ विद्यार्थी, नागरिकांची ससेहाेलपट हाेते‎ आहे. संतप्त नागरिकांनी साेमवारी‎ महापालिका आयुक्त, महापाैरांना घेराव‎ घालून कैफियत मांडली. त्यानंतर पाहणी‎ करून रेल्वेलाइनच्या भिंतीला लागून‎ असलेल्या २०० मीटर रस्त्याचे‎ विस्तारीकरण करून मार्ग काढण्याचा‎ निर्णय घेण्यात आला.‎ आसोदा रेल्वेगेट बंद करण्यात आले‎ आहे. आता कुंभार समाज मंडळाकडून‎ ममुराबाद रोडपर्यंत जाणाऱ्या पर्यायी‎ मार्गावर असलेल्या लोंबकळणाऱ्या तारा,‎ अवघड वळणामुळे बसेस नेण्यास चालक‎ नकार देतात. परिणामी आठ गावातील‎ एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.‎

संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी महापालिका‎ आयुक्त, महापौरांना घेराव घालत या‎ भागातील अतिक्रमण व बसेससाठी पर्यायी‎ मार्ग काढण्याची मागणी केली.‎ ग्रामस्थांच्या मागणीवरून कुंभार समाज‎ मंडळाकडून सरळ तिवारी केटरर्सपर्यंतचे‎ अतिक्रमण, अडथळा ठरणारी झाडे‎ काढून मारोती मंदिराजवळून वळून ममुराबाद नाक्यापर्यंतचा मार्ग‎ बसेससाठी तयार करणे, रेल्वेलाइनच्या भिंतीला‎ लागून असलेला २०० मीटरच्या रस्त्याचे‎ विस्तारीकरण करून तो एकेरी मार्ग बसेससाठी‎ तयार करण्याच्या सूचना खासदारांसह आयुक्त,‎ महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. आसोद्यासह‎ भादली, शेळगाव, कडगाव, भाेलाणे, सुजदे,‎ देऊळवाडा या गावातील बस वाहतूक बंद आहे.‎ यामुळे या गावातील संतप्त नागरिक, संयोजन‎ समितीने महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ.‎ विद्या गायकवाड यांच्यापुढे समस्या मांडली. यानंतर‎ ग्रामस्थांना सोबत घेत आयुक्त, महापौर यांनी‎ महारेलचे महाव्यवस्थापक संजय बिराजदार, एसटी‎ आगार व्यवस्थापक नीलिमा बागूल व महापालिका‎ बांधकाम अभियंता, नगररचना अधिकाऱ्यांसह‎ नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे,‎ किशोर सूर्यवंशी, डॉ. सुनील महाजन यांनी‎ परिसराची पाहणी केली.

दाेन्ही प्रस्तावास‎ सहमती संयोजन समितीचे किशोर चौधरी,‎ भादली बुद्रुक सरपंच मिलिंद चौधरी, सुभाष‎ महाजन, गिरीश भोळे, सुनील पाटील, शरद‎ नारखेडे, अनिल कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी‎ रेल्वलाइनच्या बाजूने असलेली भिंत पाडून २००‎ फुटाचा रस्ता तयार करून देण्याचा सोईस्कर असा‎ पर्याय मांडला. त्यानुसार जागेची पाहणी करण्यात‎ आली.यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रस्तावास‎ सहमती दर्शविली.‎

परीक्षेपुरते रेल्वेगेट सुरू ठेवा : खासदार उन्मेष‎ पाटील यांनीही फोनवरून रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश‎ दिले. हे दोन्ही प्रस्ताव मंजुरीसाठी डीआरएम‎ कार्यालयाकडे पाठवण्यासह मंजुरीनंतर काम सुरू‎ करून आठ दिवसांत रस्ता पूर्ण करण्याचे‎ आश्वासन दिले. परीक्षेचे दिवस लक्षात घेता काम‎ पूर्ण होईपर्यंत रेल्वेगेट सुरू करावे अशी मागणी‎ करण्यात आली. आठ दिवसांत काम न झाल्यास‎ रेल्वेराेकाेचा इशारा देण्यात आला.‎‎

५० बसफेऱ्या झाल्या बंद‎
आसाेदासह परिसरातील गावांना जाणाऱ्या‎ राेजच्या ५० बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे‎ शाळेला येणाऱ्या दीड ते पावणेदाेन हजार‎ विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांची गैरसाेय हाेत‎ आहे. बसेस बंद असल्याने या विद्यार्थ्यांना‎ खासगी वाहनाने जळगाव गाठावे लागत‎ आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसताे आहे.‎

बातम्या आणखी आहेत...