आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्षा कायम:एमपीएससी उत्तीर्ण होऊनही‎ उमेदवारांना नियुक्त्या नाहीत‎, विद्यार्थी मानसिक‎ दडपणाखाली

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी)‎‎ परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीस पात्र‎ ठरलेल्या‎ राज्यातील २१७ अभियंत्यांवर‎ उपोषण‎ करण्याची वेळ आली आहे.‎ जलसंपदा व‎ सार्वजनिक विभागाचे इतर‎ विभागात जागा‎ असताना नियुक्तिपत्रांची‎ प्रतीक्षा उमेदवार‎ करत आहेत. यामुळे अनेक‎ विद्यार्थी मानसिक‎ दडपणाखाली आहेत.‎‎

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा‎ अंतिम निकाल १२ ऑगस्ट २०२२ रोजी‎ जाहीर‎ करण्यात आला. अनेक वर्षे स्पर्धा‎ परीक्षेचा‎ अभ्यास करून एमपीएससीची‎ परीक्षा उत्तीर्ण‎ झाले तरीही अद्याप नियुक्ती‎ मिळाली नाही.‎ मधल्या काळात कोरोना‎ असल्याने परीक्षा पुढे‎ ढकलण्यात आली‎ होती.

सन २०२०मध्ये ही‎ परीक्षा झाल्यानंतर‎ त्याचा निकालही वेळेवर‎ लावला गेला‎ नाही. आता निकाल लावून सुद्धा‎‎ उमेदवारांना त्यांची नियुक्तीपत्रे देण्यासाठी‎ राज्य‎ शासनाकडे वेळ नाही. नियमाप्रमाणे‎ निवड‎ जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांच्या‎ आत‎ नियुक्ती देणे बंधनकारक आहे.

तरीही‎ राज्य‎ सरकारकडून उशीर होत आहे.‎‎ शासनाच्या २८ ऑगस्ट २०१७च्या‎ शासन‎ निर्णयानुसार निवड झालेल्या‎ उमेदवारांना‎ निवड यादी जाहीर झाल्याच्या‎ तीन‎ महिन्याच्या आत नियुक्तीपत्र पाठवणे‎‎ बंधनकारक आहे. शासनाने याकडे सपशेल‎‎ दुर्लक्ष केल्याचे चित्र समाेर येते अाहे.‎