आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा भुसावळ-यावल रस्त्यावर गेल्या महिन्यापासून एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून त्यातून उसाची वाहतूक सुरू आहे. मात्र, रात्री अनेकवेळा या दोन्ही ट्रॉली रस्त्यावर अंधारात उभ्या असतात. त्यामुळे अपघात होऊ शकतो. विशेष म्हणजे अनेक ट्रॉल्यांना मागून रिफ्लेक्टर किंवा रेडीअम लावलेले नाहीत. त्यामुळे मागून येणारे वाहन धडकून अपघात होऊ शकतो.
गेल्या बुधवारी रात्री अंजाळे गावाजवळील उतारावर दोन्ही ट्रॉल्या रस्त्यात आडव्या झाल्याने रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद हाेती. केवळ दुचाकी व लहान वाहनांची ये-जा सुरू होती. अवजड वाहनधारकांना थंडीत रस्त्यात अडकून पडावे लागले हाेते. पोलिस प्रशासनाने एखादी विपरीत घटना घडण्यापूर्वी हा प्रकार राेखवा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.