आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गानुभव:गौताळ्यात आज 18 पाणवठ्यांवर‎ वन्यप्राणी निरीक्षण, मचाण उभारले‎; गतवर्षी 7 बिबट्यांसह 332 प्राणी आढळले

चाळीसगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गौताळा अभयारण्यातील‎ वन्यजीवांच्या नोंदी घेण्यासाठी,‎ 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमेला‎ निवडक पाणवठांवर प्राणी पाहणी‎ निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयाेजन‎ करण्यात आले आहे. यासाठी‎ अभयारण्यातील १८ पाणवठ्यांवर‎ ट्रॅप कॅमेरे लावण्यासह मचाण‎ उभारण्यात आले आहेत.

आज‎ दुपारी ४ ते दुसऱ्या दिवशी शनिवारी‎ सकाळी ८ या कालावधीत प्रत्यक्ष‎ वन्यप्राणी निरीक्षण करून नाेंदी‎ घेतल्या जाणार आहेत. या काळात‎ पर्यटकांसाठी अभयारण्य बंद‎ राहणार आहे.‎ ६ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रावर‎ पसरलेले गौताळा औट्रमघाट‎ अभयारण्य राज्यातील मोठे‎ अभयारण्य मानले जाते.

या‎ अभयारण्यात ४२ किमी लांबीचे‎ सह्याद्रीचे पठार असून ८०० ते २०००‎ हेक्टरचे पाटणा, ओढरे, बोढरे,‎ जुनोने असे चार वनकक्ष, सोबत‎ पाटणा तसेच बाेढरा हे दोन‎ वनपरीमंडळ आहेत. वन्यजीव‎ विभागाकडून तेथे तयार करण्यात‎ आलेले ३० नैसर्गिक व २० कृत्रिम‎ असे एकूण ५० पाणवठे आहेत.‎

अवकाळी पावसाचे सावट
पाणस्थळांवर निरीक्षण‎ अभयारण्यातील जुनाेने तलाव,‎ पाटणा, बाेढरे व अाेढरे िबट‎ परिसरात एकूण पाच कृत्रिम‎ पाणस्थळांवर ट्रॅप कॅमेेरे लावून,‎ तसेच जुनाेने िबट भागात ४‎ िठकाणी, बाेढरे परिसरात ३, पाटणा‎ येथे ४ व अाेढरे येथे २ व इतर ५‎ अशा एकूण१८ ठिकाणांवर मचाण‎ उभारून प्रत्यक्ष निरीक्षण करून‎ प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जाणार‎ आहेत. यासाठी उपयुक्त स्थळांचे‎ निरीक्षण करून मचाण उभारण्यात‎ अाले असल्याची माहिती‎ वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर‎ देसाई यांनी दिली.‎

अभयारण्यात‎ नाेंदी घेताना‎ नियमांचे पालन‎ करणे गरजेचे‎

मानवी हस्तक्षेपामुळे‎ प्राण्यांच्या संख्येवर कोणता‎ परिणामा झाला आहे का? कोणत्या‎ प्राण्यांची संख्या कमी होत आहे?‎ अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून‎ घेण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी‎ बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्यप्राण्यांची‎ गणना केली जाते. बुद्ध पौर्णिमा मे‎ महिन्याच्या कडक उन्हाळ्यात येत‎ असल्याने जंगलातील झाडांची पाने‎ गळून गेलेली असतात.

त्यामुळे‎ लांबपर्यंतचे प्राणी मचाणावरून‎ दिसतात. त्यामुळे दूरच्या‎ अंतरावरूनही प्राण्यांचे दर्शन होते.‎ यंदा मात्र ६ मे पर्यंत अवकाळी‎ पावसाचा अंदाज अाहे. त्यासोबतच‎ तालुक्यात दाेन दिवसांपासून ढगाळ‎ वातावरण असल्याने यंदाच्या प्राणी‎ गणनेवर अवकाळी पावसाचे सावट‎ असल्याने अनेकांचा हिरमाेड झाला‎ आहे.‎

दोन वर्षांपूर्वी दिसला वाघ

वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर‎ देसाई यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अाणि निसर्गप्रेमी‎ यात सहभागी होणार आहेत. दोन वर्षांपूर्वी गौताळा अभयारण्यात यवतमाळ‎ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत असलेल्या टिपेश्वर वन्यजीव‎ अभयारण्यातून अालेला वाघ िदसून अाला हाेता.

तर गतवर्षी झालेल्या‎ प्राणी गणनेत अभयारण्यात ७ बिबट्यासंह तब्बल ३३२ प्राणी आढळून‎ आले होते. त्यामुळे यंदा िनसर्गानुभव कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे.‎ पाटणादेवी अभयारण्यात प्राणी गणनेसाठी वन विभागाने तयार केलेले‎ अभयारण्यातील पाणस्थळांवर निसर्गानुभव कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.‎ यासाठी तात्पुरते मचाण उभारण्यात अाले आहेत.

उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता‎ वन्यजीव पाणवठ्यांवर पाणी पिण्यास येतात, त्यांच्या नोंदी घेतल्या जातील. सहभागी‎ होणाऱ्या व्यक्तींना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व संरक्षित क्षेत्राच्या सर्व‎ नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

-ज्ञानेश्वर देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी‎