आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:विद्यार्थ्यांना दिलासा; तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी तीन फेऱ्या; द्वितीय वर्ष प्रवेशासाठी 20 टक्के जागा

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनात पालक गमावलेल्यासांठी दोन जागा राखीव

शासकीय तंत्रनिकेतन अर्थात पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा दोन ऐवजी तीन फेऱ्याहोणार आहेत. कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीएम केअरअंतर्गत दोन जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नावनोंदणी करता येणार आहे.

यंदा तीन फेऱ्या राबवण्यात येतील. मराठी माध्यम निवडण्याची संधीही उपलब्ध असणार आहे. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. आजवर त्यांना मर्यादित शाखेत प्रवेश मिळतहोता. आता कोणत्याही शाखेत प्रवेश घेता येईल. प्रथम वर्ष पदविका प्रवेशप्रक्रिया २ जूनपासून सुरू झाली असून, ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. तर थेट द्वितीय वर्षाची प्रक्रिया १० जूनपासून ९ जुलैपर्यंत चालणार आहे. तंत्रनिकेतनच्या १६ महाविद्यालयांत ३ हजार ९५७ जागा आहेत.