आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण हक्क अर्थात आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू असताना त्यात मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागताे आहे. काही दिवसांपासून संकेतस्थळ चालत नसल्याने कोणाशी संपर्क साधायचा याची माहिती देण्यात आलेली नसल्याने पालकांची कोंडी झाली आहे. याचा गैरफायदा सायबर कॅफेचालकांकडून घेतला जात असल्याचे चित्र अाहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील दुर्बल व वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
त्यामुळे पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी १७ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले होते. प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार होती. याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर, आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लाभला आहे. प्रवेश प्रक्रियेत शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, पालकांना १७ मार्चदरम्यान अर्ज करता येणार आहेत. जिल्ह्यात २८२ शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केलेली असून, ३१२२ जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी १७ मार्च शेवटची तारीख असली तरी आतापर्यंत ६८६९ अर्थात दुपटीने अर्ज सादर झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.