आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारणा‎:मनपाच्या करवसुलीच्या पत्राने‎ शासकीय कार्यालयांची काेंडी‎

जळगाव‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे‎ शासकीय कार्यालयांनाही अभय याेजनेचा‎ लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार‎ मनपाने सर्वच थकबाकीदार कार्यालयांना पत्र‎ पाठवले आहे. त्यामुळे भविष्यात करात सूट‎ मिळत असतानाही लाभ न घेणाऱ्या‎ शासकीय कार्यालयांना आॅडिटमध्ये जाब‎ विचारला जाण्याची शक्यता आहे. साडेचार‎ काेटींची थकबाकी असून, त्यातून ३० टक्के‎ रकमेची बचत हाेणार आहे.

आठवडाभरात‎ शासकीय कार्यालयांनी भरणा न केल्यास‎ सर्वसामान्य करदात्यांप्रमाणे कारवाईचा इशारा‎ देण्यात आला आहे.‎ महानगरपालिकेने अभय शास्ती माफी‎ योजना ५ फेब्रुवारीपासून सुरू केली असून,‎ १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. १० मार्चपर्यंत‎ मालमत्ता कराची एकूण थकबाकी ८३ कोटी‎ रुपये वसूल झाली आहे. तर मागील तीन‎ दिवसांत मालमत्ता कराची थकबाकी‎ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन‎ एकूण साडेतीन कोटी रुपयांचा भरणा‎ महापालिकेकडे करण्यात आलेला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...