आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा लाकूड तोडत असताना आग्या मोहोळाच्या मध माशा चावू लागल्या. यानंतर आग्या मोहोळ पासून बचावासाठी शेततळ्यात उडी मारली. परंतु,पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंठा तालुक्यातील जयपूर येथे बुधवारी सायंकाळी घडली. राजाभाऊ श्रीरंग कांबळे (४०, रा.देवळा, ता. परतूर ) असे मृताचे नाव आहे. राजाभाऊ कांबळे हे बुधवारी सायंकाळी जयपूर शिवारातील शेतात काम करीत होते. त्याचवेळी त्यांच्या मागे आग्या मोहोळ लागले.
मोहोळपासून बचावासाठी त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेततळ्यात उडी मारली. परंतु, आग्या माेहाेळाच्या माश्या त्यांना पाण्याबाहेर येऊ देत नव्हत्या. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब ग्रामस्थांना समजली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती सेवली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर पाण्याबाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी सेवली ठाण्यात मृत्यूची नोंद झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.