आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळ्याकडे धाव:मधमाशांपासून बचावासाठी‎ तळ्यात उडी घेतल्याने मृत्यू‎

मंठा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ लाकूड तोडत असताना आग्या‎ मोहोळाच्या मध माशा चावू लागल्या.‎ यानंतर आग्या मोहोळ पासून‎ बचावासाठी ‎शेततळ्यात उडी ‎मारली. परंतु,‎पाण्यात बुडून एका ‎व्यक्तीचा मृत्यू ‎झाल्याची घटना ‎मंठा तालुक्यातील ‎जयपूर येथे‎ बुधवारी सायंकाळी घडली.‎ राजाभाऊ श्रीरंग कांबळे (४०,‎ रा.देवळा, ता. परतूर ) असे मृताचे‎ नाव आहे.‎ राजाभाऊ कांबळे हे बुधवारी‎ सायंकाळी जयपूर शिवारातील शेतात‎ काम करीत होते. त्याचवेळी त्यांच्या‎ मागे आग्या मोहोळ लागले.‎

मोहोळपासून बचावासाठी त्यांनी‎ शेततळ्याकडे धाव घेतली.‎ शेततळ्यात उडी मारली. परंतु,‎ आग्या माेहाेळाच्या माश्या त्यांना‎ पाण्याबाहेर येऊ देत नव्हत्या. त्यामुळे‎ त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही‎ बाब ग्रामस्थांना समजली. ग्रामस्थांनी‎ घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती‎ सेवली पोलिसांना देण्यात आली.‎ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन‎ मृतदेह बाहेर पाण्याबाहेर काढला.‎ घटनास्थळाचा पंचनामा करून‎ पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी‎ पाठविला. या प्रकरणी सेवली ठाण्यात‎ मृत्यूची नोंद झाली.‎

बातम्या आणखी आहेत...