आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत योजना:शहरात सहा जलकुंभ वाढल्याने आता कमी‎ वेळेत जास्त दाबाने मिळणार पिण्याचे पाणी‎, 40 टक्के भागात पाणीपुरवठा सुरू

प्रतिनिधी | जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात साडेपाच वर्षांपासून सुरू‎ असलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ४०‎ टक्के भागात अमृत अंतर्गत पाणीपुरवठा‎ सुरू आहे. महिनाअखेर आणखी सहा‎ जलकुंभ कार्यान्वित होतील. त्याचा‎ फायदा पाणीपुरवठ्याचे नियोजनात‎ होणार असून, कमी वेळेत उच्च दाबाने‎ पुरवठा करता येणार आहे. याशिवाय‎ वेळेत बचत होऊन अवेळी होणारा‎ पुरवठा टाळता येईल. हे अनुभवण्यासाठी‎ जळगावकरांना आणखी दोन महिने‎ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या‎ एकेक जलकुंभातून पुरवठ्याचे नियोजन‎ हाती घेण्यात आले आहे.‎ अमृत अभियानात शहरात २०१८पासून‎ पाणीपुरवठा योजना राबवली जाते आहे.‎ जून २०२३मध्ये या योजनेच्या कामाला‎ साडेपाच वर्षे पूर्ण होतील. १७ नोव्हेंबर‎ २०१७ रोजी योजनेसाठी जैन इरिगेशन‎ सिस्टिम्स कंपनीला कार्यादेश दिले होते.‎ २४ महिन्यांत अर्थात १६ नोव्हेंबर २०१९‎ रोजी काम पूर्णत्वासाठी मुदत दिली होती;‎ परंतु वारंवार मुदत देऊन साडेतीन वर्षे‎ लोटले गेले आहेत.

कवयित्री बहिणाबाई जलकुंभावरून शुक्रवारपासून पुरवठा‎

कवयित्री बहिणाबाई जलकुंभ झोन क्रमांक‎ ११ अंतर्गत ५ मेपासून अमृत योजनेचा नवीन‎ जलवाहिनीद्वारे नियमित पुरवठा सुरू होणार‎ आहे. बजरंग कॉलनी, दशरथनगर, श्रीराम‎ कॉलनी, काशिनाथनगर, सदाशिवनगर,‎ द्वारकानगर, सदोबानगर, योगेश्वरनगर आदी‎ ४५ कॉलन्यांत पुरवठा होईल. या भागातील‎ जुन्या जलवाहिनीचा पुरवठा बंद करण्यात‎ येणार आहे. तसेच या झोनमधील खेडीगाव‎ व आजूबाजूच्या परिसरात १२ मे नंतर‎ नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे,‎ असे अभियंता संजय नेमाडे यांनी सांगितले.‎

नियोजन : नवीन जलकुंभांची स्थिती अशी‎

सुप्रीम कॉलनी : या जलकुंभावरील‎ जलवाहिनी जोडणी पूर्ण झाली आहे. १५‎ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभातून सुप्रीम‎ कॉलनीसह वाढीव भागात पुरवठा सुरू.‎

रामेश्वर कॉलनी : रेमंड जवळील‎ जलकुंभाची जलवाहिनी जोडणी पूर्ण झाली.‎ ३० लाख लिटर क्षमतेच्या या जलकुंभातून‎ काही भागात पाणीपुरवठा होतो आहे.‎

नित्यानंद जलकुंभ : रायसोनी नगरातील‎ जलकुंभाला जलवाहिनी जोडणी पूर्ण झाली‎ आहे. १५ लाख लिटर क्षमतेचा आहे.‎ साफसफाई व टेस्टिंग केली जाईल.‎

निमखेडी : भागासाठीच्या जलकुंभाला‎ जलवाहिनी जोडणी झाली. १५ लाख लिटर‎ क्षमतेचा जलकुंभ असून, पाणीपुरवठा सुरू‎ आहे. पिंप्राळा येथे मुख्य जलवाहिनीची‎ जोडणीचे काम सद्यस्थितीत सुरू आहे.‎

गेंदालाल मिल : शिवाजीनगर, गेंदालाल‎ मिलसाठी आणखी एक जलकुंभाचे काम‎ पूर्ण झाले आहे. पिंप्राळा रेल्वेगेटजवळ‎ क्रॉसिंगचे काम प्रलंबित आहे. १५ लाख‎ लिटर क्षमतेचा हा जलकुंभ आहे. सध्या‎ जुन्या जलवाहिनीला जोडणी केली आहे.‎ अयोध्यानगर : या भागातील २५ लक्ष‎ क्षमतेच्या जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे;‎ परंतु विद्युत रोहित्राची अडचण आहे. ते‎ स्थलांतरित झाल्यावरच जलवाहिनी जोडणी‎ होईल. त्यानंतर तेथून पाणीपुरवठा होणार.‎

४३०० नळ‎ कनेक्शन वाढले‎

महापालिकेने अमृत‎ योजनेंतर्गत ६८ हजार‎ नळजोडणीची यादी‎ दिली होती. जुन्या‎ जलवाहिनीवर मोठ्या‎ प्रमाणात अनधिकृत‎ नळकनेक्शन असल्याने‎ प्रत्यक्षात आकडा मोठा‎ होता; परंतु योजनेंतर्गत‎ नोंदणी असलेल्या‎ मिळकतींनाच जोडणी‎ मिळत असल्याने दोन‎ वर्षात ४३०० नळजोडणी‎ वाढली आहे. यामुळे‎ प्रत्येक जोडणीतून‎ दरवर्षी दोन हजारप्रमाणे‎ ८६ लाख रुपये पाणीपट्टी‎ वाढली आहे. बोगस‎ नळकनेक्शनलाही‎ आळा बसल्याचा दावा‎ केला जातो आहे हे‎ विसरता येणार नाही.‎