आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत कथा:श्रीकृष्ण जन्माेत्सवातील सजीव आरासने‎ आशाबाबानगरात द्वापार युग अवतरले‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशाबाबानगरात वृंदावन मित्र मंडळ‎ व श्रीमद भागवत बहुउद्देशीय सेवा‎ संस्थेतर्फे अखंड हरिनाम संकीर्तन व‎ संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह‎ सुरू आहे. या भागवत कथेत गुरुवारी‎ सायंकाळी श्रीकृष्ण जन्मावर सजीव‎ आरास साकारण्यात आली. यात भरत‎ सैंदाणे यांनी वासुदेवाची तर आठ‎ महिन्यांचा चिमुरडा तनुष पाटील हा‎ श्रीकृष्ण झाला होता.

या सजीव‎ आरासमुळे आशाबाबानगरात द्वापार‎ युग अवतरल्याचा भास होत होता.‎ आशाबाबानगरात २९‎ जानेवारीपासून हरिनाम संकीर्तन व‎ संगीतमय भागवत कथा सुरू आहे.‎ यंदा भागवत कथेचे पाचवे वर्षे आहे.‎ दैनंदिन कार्यक्रमात काकड आरती,‎ हरिपाठ, भागवत कथा व संकीर्तन असे‎ कार्यक्रम घेण्यात येत आहे.

गुरुवारी‎ भागवत कथाकार श्रीराम महाराज यांनी‎ वराह अवतार, वामन अवतार, मच्छिंद्र‎ अवतार अशा विविध अवतारांवर‎ निरूपण करत सायंकाळी ५ वाजता‎ श्रीकृष्ण जन्मावर सजीव आरास‎ साकारण्यात आली. या संगीतमय‎ भागवत कथेसाठी वृंदावन सांस्कृतिक‎ मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष‎ विश्वनाथ सैंदाणे, श्रीमद भागवत‎ बहुउद्देशीय सेवा संस्था अध्यक्ष‎ विलास कोळी, मुरलीधर खलसे,‎ गजानन महाजन, राजकुमार महाले‎ आदींनी सहकार्य केले.‎

जन्मोत्सवावेळी‎ फुलांची उधळण‎
वासुदेवांचे बाल श्रीकृष्णांसह आगमन सभा मंडपात झाल्यावर त्यांच्यावर फुलांची मोठी‎ उधळण करण्यात आली. तसेच स्वागतपर संगीतमय धार्मिक गाणी म्हणण्यात आली. बाल‎ श्रीकृष्णाची लीला पाहण्यासाठी या निमित्ताने संपूर्ण संभामंडपातील भाविक उभे झाले होते.‎ त्यांनी वासुदेव व श्रीकृष्णाला उपस्थितांनी जाण्यास मार्ग करून दिला.‎

उद्या पालखी सोहळा‎
सप्ताहात ४ जानेवारी रोजी‎ दुपारी ३ वाजता पालखी‎ सोहळ्याचे आयोजन‎ करण्यात आले आहे.‎ त्यानंतर ५ जानेवारी रोजी‎ सकाळी ९ वाजता श्रीराम‎ महाराज उंटावदकर यांचे‎ काल्याचे कीर्तन, दुपारी १२‎ वाजता महाप्रसादाचा‎ कार्यक्रम हाेणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...