आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला‎:परीक्षांचे मूल्यमापन गांभीर्याने करा; कुलगुरू‎ माहेश्वरी यांचे प्राध्यापकांना पत्र

प्रतिनिधी | जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.‎ ‎ व्ही. एल.‎ ‎ माहेश्वरी यांनी‎ ‎ विद्यापीठाशी‎ ‎ संलग्नित‎ ‎ महाविद्यालयाच्या‎ ‎ शिक्षकांना पत्र‎ पाठवून परीक्षेच्या मूल्यमापनाचे‎ काम गांभीर्याने करून सहकार्य‎ करण्याचे आवाहन केले आहे. या‎ संदर्भात प्राध्यापक संघटनेने‎ सहकार्य करण्याचा शब्द दिला‎ आहे; परंतु प्राध्यापकांचा विचार‎ विद्यापीठ का करीत नाही? अशी‎ खंत व्यक्त केली. तर सिनेट सदस्य‎ नितीन ठाकूर यांनी रोष व्यक्त केला.‎ कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी ‎ ‎ शिक्षकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले ‎ ‎ आहे की, विद्यापीठ परीक्षांना‎ नुकतीच सुरुवात झाली. परीक्षा ‎ ‎ विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने ‎ ‎ महत्त्वाची असते. अध्यापन‎ करण्याची जबाबदारी अध्यापकांनी‎ पार पाडल्यानंतर विषय ज्ञान ‎ ‎ विद्यार्थ्यांनी आत्मसात केले की‎ नाही? याचे मूल्यमापन करण्यासाठी‎ परीक्षा हा अनिवार्य टप्पा आहे.‎ त्यामुळे परीक्षेनंतर सुरू होणाऱ्या‎ उत्तरपत्रिका मूल्यमापन पत्रिकेत‎ शिक्षकांची भूमिका कळीची आहे.‎

प्राध्यापकांच्या अडचणींचाही विचार करावा‎

कुलगुरूंच्या आवाहनाला‎ आम्ही सकारात्मकतेने बघतो.‎ प्राध्यापकही आपले काम चोख‎ बजावतात. पण विद्यापीठाकडून‎ दरवर्षी सुट्या, परीक्षा‎ नियोजनबाबत ऐनवेळेस बदल‎ करण्याची परंपरा याही वर्षी‎ कायम आहे. परगावी जाणाऱ्या‎ प्राध्यापकांच्या अडचणींचाही‎ विद्यापीठाने विचार करावा.‎ विद्यापीठाला अकॅडमिक‎ कॅलेंडर वारंवार बदलावे लागते.‎ इतर विद्यापीठांना जे जमते ते‎ आपल्याला का जमत नाही?‎ - प्रा. नितीन बारी, अध्यक्ष,‎ एन.मुक्ता संघटना, जळगाव‎

विद्यापीठ प्रशासनाने स्वत: जबाबदारी घ्यावी‎

​​​​​​​निकालांमध्ये सातत्याने घोळ होत आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा‎ विभागाच्या यंत्रणेत अनेक त्रुटी आहेत. प्रशासन प्राध्यापकांवर‎ जबाबदारी झटकून मोकळे होत आहे. कुलगुरूंनी याबाबत प्रमुख‎ म्हणून स्वत: जबाबदारी घेऊन उपाय शोधले पाहिजे .‎ - नितीन ठाकूर, सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि.‎