आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 महिन्यांनंतर योग:बुद्धपाैर्णिमेला रात्री 8ः44 वाजता वर्षातील‎ पहिले छायाकल्प चंद्रग्रहण पाहण्याची संधी‎, ग्रहणाचा काळ 4 तास 18 मिनिटांचा

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्यग्रहणानंतर या वर्षातील पहिले‎ छायाकल्प चंद्रग्रहणाची अनुभूती‎ खगोलप्रेमींना शुक्रवारी बुद्धपाैर्णिमेच्या‎ दिवशी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी घेता‎ येणार आहे. हे चंद्रग्रहण पाहिल्याने‎ कुठलाही धोका, त्रास होणार नसल्याचा‎ दावा खगोल अभ्यासकांनी केला आहे.‎

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे ही‎ घटना बघण्यास अडचण येऊ शकते.‎ त्यामुळे नागरिकांनी कोणतेही समज-‎ गैरसमज मनात न ठेवता या खगोलीय‎ घटनेचा आनंद घ्यावा, असे‎ अभ्यासकांनी सांगितले आहे.‎ खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी‎ दिलेल्या माहितीनुसार या वर्षात २‎ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण आहेत.‎ त्यातील फक्त चंद्रग्रहण भारतातून‎ बघायला मिळणार आहे.

खग्रास आणि‎ खंडग्रास चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या गडद‎ सावलीतून जात असल्याने आपल्याला‎ आधी तो काळा व नंतर लाल दिसतो;‎ परंतु शुक्रवारी चंद्र पृथ्वीच्या विरळ‎ छायेतून जाणार असल्याने चंद्र काळा व‎ लाल न दिसता तो थोडासा काळपट‎ आणि त्याचा प्रकाश थोडा मंद झालेला‎ जाणवेल. ग्रहणाच्या वेळेत चंद्र पृथ्वीच्या‎ विरळ सावलीला स्पर्श करेल आणि‎ छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल.

‎ रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी चंद्र‎ पृथ्वीच्या विरळ गेलेला असेल. शनिवारी‎ पहाटे हे ग्रहण संपलेले असेल. ग्रहणाचा‎ काळ ४ तास १८ मिनिटांचा आहे.‎ पुढचे चंद्रग्रहण २५ मार्चला असणार‎ छायाकल्प चंद्रग्रहण आशिया,‎ आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका,‎ पेसिफिक, इंडियन आणि अॅटलांटिक‎ महासागरातून दिसेल. या आधी ५ जून‎ २०२० रोजी झालेले छायाकल्प चंद्रग्रहण‎ भारतातून दिसले होते. त्याचा ग्रहण काळ‎ ३ तास १८ मिनिटांचा होता.

यापुढचे‎ छायाकल्प चंद्रग्रहण हे २५ मार्च २०२४‎ रोजी आहे; पण ते फक्त उत्तर आणि‎ दक्षिण अमेरिकेतून दिसणार असल्याचे‎ अभ्यासकांनी सांगितले.‎ अवकाशात पृथ्वीच्या दोन सावल्या पडतात‎ गडद सावली आणि विरळ सावली. चंद्राची‎ पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची‎ सूर्याभोवती फिरण्याची कक्षा (आयनिक वृत्त)‎ यांच्यात ५ अंशाचा कोन आहे. चंद्राची कक्षा‎ आयनिक वृत्ताला दोन ठिकाणी छेदते त्या बिंदूंना‎ राहू, केतू असे म्हणतात.

थोडक्यात म्हणजे सूर्य,‎ पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत ज्या बिंदूपाशी‎ येतात त्यांना राहू आणि केतू असे म्हणतात.‎ चंद्राच्या कक्षेत आयनिक वृत्तात असलेल्या‎ कोनामुळे प्रत्येक पौर्णिमेला चंद्र या बिंदूंवर‎ असतोच असे नाही. चंद्र जसा पृथ्वीभोवती‎ फिरतो तशी पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते.‎ त्यामुळे हे दोन्ही बिंदू सुद्धा फिरत असतात.

ज्या‎ दिवशी पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर‎ राहू किंवा केतू हे बिंदू असताना तेथे चंद्र आला‎ तर तो पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो आणि‎ ‘खग्रास’ चंद्रग्रहण पाहायला मिळते. थोडक्यात‎ असे की जो पर्यंत सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि हे दोन‎ बिंदू पैकी एक समान प्रतलात येत नाही तो पर्यंत‎ कोणतेही ग्रहण होत नाही.‎

काय आहे छायाकल्प चंद्रग्रहण‎

प्रत्येक वेळी फक्त खग्रास चंद्रग्रहण होते असे नाही तर‎ ‘छायाकल्प’ किंवा ‘खंडग्रास’ चंद्रग्रहणही होते. चंद्र राहू‎ किंवा केतू या बिंदूंच्या खूप वर (उत्तरेला) किंवा खाली‎ (दक्षिणेला) असतो. अशा वेळी चंद्र पृथ्वीच्या फक्त विरळ‎ सावलीतून पूर्ण किंवा अर्धाच जातो या ग्रहणाला ‘छायाकल्प’‎ चंद्रग्रहण म्हणतात, असे अभ्यासकांनी सांगितले.‎

ज्योतिषशास्त्री विनोद त्रिपाठी यांनुसार ग्रहणावेळी राशीवर होणारा परिणाम‎

मेष : एखादा चुकीचा निर्णय‎ महागात पडू शकतो.‎ वृषभ : कुटुंबात तणावपूर्ण‎ स्थिती असेल. त्यामुळे या‎ काळात काळजी घ्या.‎ कर्क : आरोग्याच्या तक्रारी‎ डोकं वर काढतील. नोकरीच्या‎ ठिकाणी त्रास होऊ शकतो.‎ सिंह : काही वाईट बातमी‎ कानावर पडल्याने अस्वस्थता‎ वाढेल. कुटुंबाची काळजी घेणं‎ गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण निर्णय‎ घेण्यापूर्वी विचार करा.‎ कन्या : उत्तरार्धात थोडे‎ मानसिक ताण राहील मात्र इतर‎ कोणतेही वाईट परिणाम नाही.‎ तूळ : तुला ही शुक्राची राशी‎ असल्याने विवाह इच्छुकांच्या‎ बोलणी फिस्कटतील.‎ वृश्चिक : नवीन घर‎ घेणाऱ्यांसाठी काही काळ‎ थांबणे योग्य राहील अन्यथा‎ फसवणूक होऊ शकते.‎ धनू : या राशींच्या जातकांना‎ क्रोध अनावर होईल. क्रोधामुळे‎ संबंध दुरावतील. छोट्या‎ अपघाताची देखील शक्यता.‎ मकर : या राशीच्या जातकांना‎ मिश्र स्वरूपाचे फळ छायाकल्प‎ चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे.‎ कुंभ : या राशीतील लाेकांना‎ भाग्योदयात अडचणी येतील.‎ धार्मिक यात्रा टाळाव्या; मात्र‎ चंद्रग्रहणामुळे जुन्या व्याधी‎ डोकं वर काढतील.‎ मीन : धार्मिकतेकडे मन रमेल.‎ चंद्रग्रहणामुळे काही काळ‎ जवळच्या व्यक्ती दुरावतील.‎ गोंधळाची स्थिती होईल.‎

काय आहे छायाकल्प चंद्रग्रहण‎ प्रत्येक वेळी फक्त खग्रास चंद्रग्रहण होते असे नाही तर‎ ‘छायाकल्प’ किंवा ‘खंडग्रास’ चंद्रग्रहणही होते. चंद्र राहू‎ किंवा केतू या बिंदूंच्या खूप वर (उत्तरेला) किंवा खाली‎ (दक्षिणेला) असतो. अशा वेळी चंद्र पृथ्वीच्या फक्त विरळ‎ सावलीतून पूर्ण किंवा अर्धाच जातो या ग्रहणाला ‘छायाकल्प’‎ चंद्रग्रहण म्हणतात, असे अभ्यासकांनी सांगितले.‎ ज्योतिषशास्त्री विनोद त्रिपाठी यांनुसार ग्रहणावेळी राशीवर होणारा परिणाम‎ मेष : एखादा चुकीचा निर्णय‎ महागात पडू शकतो.‎ वृषभ : कुटुंबात तणावपूर्ण‎ स्थिती असेल. त्यामुळे या‎ काळात काळजी घ्या.‎ कर्क : आरोग्याच्या तक्रारी‎ डोकं वर काढतील. नोकरीच्या‎ ठिकाणी त्रास होऊ शकतो.‎ सिंह : काही वाईट बातमी‎ कानावर पडल्याने अस्वस्थता‎ वाढेल. कुटुंबाची काळजी घेणं‎ गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण निर्णय‎ घेण्यापूर्वी विचार करा.‎ कन्या : उत्तरार्धात थोडे‎ मानसिक ताण राहील मात्र इतर‎ कोणतेही वाईट परिणाम नाही.‎ तूळ : तुला ही शुक्राची राशी‎ असल्याने विवाह इच्छुकांच्या‎ बोलणी फिस्कटतील.‎ वृश्चिक : नवीन घर‎ घेणाऱ्यांसाठी काही काळ‎ थांबणे योग्य राहील अन्यथा‎ फसवणूक होऊ शकते.‎ धनू : या राशींच्या जातकांना‎ क्रोध अनावर होईल. क्रोधामुळे‎ संबंध दुरावतील. छोट्या‎ अपघाताची देखील शक्यता.‎ मकर : या राशीच्या जातकांना‎ मिश्र स्वरूपाचे फळ छायाकल्प‎ चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे.‎ कुंभ : या राशीतील लाेकांना‎ भाग्योदयात अडचणी येतील.‎ धार्मिक यात्रा टाळाव्या; मात्र‎ चंद्रग्रहणामुळे जुन्या व्याधी‎ डोकं वर काढतील.‎ मीन : धार्मिकतेकडे मन रमेल.‎ चंद्रग्रहणामुळे काही काळ‎ जवळच्या व्यक्ती दुरावतील.‎ गोंधळाची स्थिती होईल.‎ ‎ ‎ ‎