आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त विरुद्ध महापाैर:पदाधिकाऱ्यांच्या कामांकडे मनपा प्रशासनाचा कानाडाेळा; राज्यकर्त्यांच्या दबावात असल्याचा आराेप‎

जळगाव‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेची मुदत संपायला अवघे‎ चार महिने शिल्लक असताना‎ महापाैर विरुद्ध अायुक्त असा संघर्ष‎ रंगण्याची शक्यता निर्माण झाली‎ अाहे. पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या‎ कामांना मनपाकडून प्राधान्य दिले‎ जात नसल्याने वादामागचे मूळ‎ कारण अाहे.

जनतेच्या समस्या‎ साेडवण्यासाठी प्रशासन अपूर्ण‎ पडत अाहे; परंतु त्याचे खापर‎ नगरसेवकांवर फाेडले जात अाहे.‎ अायुक्त राज्यकर्त्यांच्या दबावात‎ काम करीत असल्यामुळेच जनतेचे‎ प्रश्न सुटण्यास अडचणी येत‎ असल्याचा थेट अाराेप महापाैरांनी‎ पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे नाव‎ न घेता केला अाहे.‎

मनपाच्या निवडणुकीपूर्वीच‎ ठाकरे गट व शिंदे गट असा संघर्ष ‎ ‎ वाढण्याची शक्यता निर्माण झाली‎ अाहे. मनपात शिंदे गटाचे १५‎ नगरसेवक अाहेत. साेबतीला‎ भाजपची साथ अाहे. तर सत्तेतील ‎ ‎ ठाकरे गटात ठाकरे गटाचे १३‎ नगरसेवक व बंडखाेर नगरसेवक‎ असे राजकीय बळ अाहेे.‎

मनपाकडून सत्ताधाऱ्यांएेवजी शिंदे ‎ ‎ गटाच्या नगरसेवकांना अधिक‎ प्राधान्य दिले जात असल्याची टीका‎ हाेत अाहे. महापाैर जयश्री महाजन‎ यांनी मनपा प्रशासन राज्यातील शिंदे‎ सरकारच्या दबावात काम करीत‎ असल्याचा अाराेप केला अाहे.‎

अायुक्तांना सुचवलेली कामे‎ टाळली जातात

महापाैर महाजन‎ यांनी अायुक्त डाॅ. विद्या गायकवाड‎ यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.‎ नागरिकांच्या समस्या असाे की‎ प्रशासकीय कामातील गतिमानता‎ असाे याबाबत सूचना केल्यानंतरही‎ त्यात सुधारणा हाेत नाही. यामागे‎ राज्यातील सत्तेचा खेळ अाहे.‎ अामचे एेकले जात नाही. अायुक्त‎ राज्यकर्त्यांच्या दबावात काम करीत‎ असल्याचा अाराेप केला.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

१२ कर्मचाऱ्यांसाठी पत्र पाठवणार‎

९६ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना‎ कायम करण्यास मंजुरी मिळाली. १२‎ कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अटीची‎ समस्या हाेती. शासनाने त्यात‎ शिथिलता दिल्याने नवीन‎ अाकृतिबंधानुसार मंजुरी मिळावी‎ यासाठी शासनाला पत्र पाठवणार‎ असल्याचे अायुक्तांनी सांगितले.‎‎

पत्रांना उत्तरे दिली जात नाही हे खरे‎

अायुक्त डाॅ. गायकवाड यांनी अामदार असाे की महापाैरांनी दिलेल्या पत्रांना‎ उत्तर दिली जात नाही हे खरे अाहे; परंतु काही वेळेला प्रशासनाला निर्णय‎ घेताना वेळ लागत असताे. कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा‎ लागताे. अामच्यावर काेणाचाही दबाव नाही. जनतेचे प्रश्न साेडवण्यासाठी‎ सर्वच अधिकाऱ्यांना सूचना केल्याचे सांगितले. दरम्यान, पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क हाेऊ न शकल्याने राज्यकर्त्यांवर झालेल्या‎ अाराेपांबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.