आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎:जळगावात एप्रिलमध्ये दाेन दिवशीय‎ बाैद्ध साहित्य संमेलन; तयारीला वेग‎

जळगाव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बौद्ध साहित्य परिषदेतर्फे तिसरे‎ राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन‎ जळगावातील लेवा भवनात २ व ३‎ एप्रिल असे दाेन दिवस हाेणार आहे.‎ तयारीसाठी नियुक्त केलेल्या‎ समित्यांची आढावा बैठक महाराष्ट्र‎ जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा‎ राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे‎ प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी‎ घेतली. लाेकसहभाग कसा वाढेल‎ यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे‎ आवाहन त्यांनी केले.‎ स्वागत समिती, प्रचार व प्रसार‎ समिती, कार्यक्रम संचलन समिती,‎ ग्रंथ प्रदर्शन समिती, भोजन समिती,‎ निवास व्यवस्था समिती, धम्मग्रंथ‎ समता दिंडी संयोजन समिती अशा‎ महत्त्वपूर्ण समित्यांनी आढावा सादर‎ केला. त्यात जवळपास हजार‎ प्रतिनिधींची संमेलनाला उपस्थिती‎ राहणार असल्याची माहिती देण्यात‎ आली.

बौद्ध साहित्य संमेलनाचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शहराचे अध्यक्ष बाबुराव वाघ यांनी‎ या बैठकीपुर्वी प्रास्ताविकेतून‎ संमेलनाची रूपरेषा सांगितली.‎ ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ‎ यांनी संमेलनाची भूमिका मांडून‎ संमेलन यशस्वी होण्यासाठी कृती‎ कार्यक्रमाची चर्चा केली. हरिश्चंद्र‎ सोनवणे यांनी संमेलनाच्या निवास‎ व्यवस्थेच्या संदर्भात मत मांडले प्रा.‎ डॉ. सत्यजित साळवे यांनीही विचार‎ मांडले.

बैठकीला मिलिंद केदार,‎ संतोष गायकवाड, वाल्मीक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सपकाळे, मिलिंद तायडे, महेंद्र‎ केदारे, आनंदा तायडे, यशवंत‎ घोडेस्वार, दिलीप सोनवणे, गौतम‎ सपकाळे भिवसन अडकमोल,‎ बापूराव पाटील, प्रा. प्रितीलाल‎ पवार, भारत सोनवणे, सुनील‎ सोनवणे, समाधान सोनवणे, राजेश‎ पाटोळे, प्रकाश दाभाडे, भारत‎ सोनवणे, समाधान सोनवणे,‎ चंद्रमणी सोनवणे उपस्थित होते.‎ बैठकीचे आभार उदय सपकाळे‎ यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...